@Spearcorps/X
राष्ट्रीय

आसाम रायफल्सच्या दोन बटालियन काश्मीरला पाठविणार

दहशतवादविरोधी कारवायांसाठी आसाम रायफल्सच्या दोन बटालियन मणिपूरमधून जम्मू-काश्मीर येथे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. जम्मू-काश्मीरमधून दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.

Swapnil S

इम्फाळ : दहशतवादविरोधी कारवायांसाठी आसाम रायफल्सच्या दोन बटालियन मणिपूरमधून जम्मू-काश्मीर येथे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. जम्मू-काश्मीरमधून दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सीआरपीएफच्या या १५०० सैनिक असलेल्या दोन तुकड्या मणिपूर येथे तैनात होत्या, असे सूत्रांनी सांगितले. मणिपूरमध्ये तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या उर्वरित बटालियन्स बंडखोरीविरोधी आणि सीमा रक्षणाच्या दुहेरी भूमिकेसाठी कार्यरत राहतील, असे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृहमंत्री अमित शहा हेही या बैठकीला उपस्थित होते.

आजचे राशिभविष्य, ३ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Sunday special : कोळंबीप्रेमींसाठी खास ट्रीट! तंदूरशिवाय घरीच बनवा झणझणीत 'तंदूरी प्रॉन्स'

Kitchen Tips : 'अशी' तयारी असेल तर स्वयंपाक होईल झटपट; महिलांसाठी स्मार्ट किचन टिप्स

माठातलं पाणी किती दिवसांनी बदलावं? उन्हाळ्यात 'ही' चूक टाळली नाही तर आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळी चहा-कॉफीशिवायही मिळू शकते भरपूर एनर्जी; न्यूट्रिशनिस्टने सांगितले ६ हेल्दी पर्याय