राष्ट्रीय

मिझोराममध्ये मोठी दुर्घटना ! बांधकाम सुरु असतानाच कोसळला पुल ; 17 जणांचा मृत्यू

मिझोरामची राजधानी आयजोल पासून 21 किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला

नवशक्ती Web Desk

मिझोराममध्ये बुधवार (२३ ऑगस्ट) रोजी एक मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून 17 कामगारांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकार्‍यांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मिझोरामची राजधानी आयजोल पासून 21 किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार असं समजतंय की, ही दुर्घटना घडली त्यावेळी बांधकाम सुरु असलेल्या पुलावर 35 ते 40 मजूर काम करत होते. बैराबी ते सायरंगला जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. या पुलदुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं.

तिसऱ्या व चौथ्या खांबामधील गर्डर 341 फूट खोल पडला होता. पुलामध्ये एकूण 4 खांब असून त्यापैकी तिसऱ्या व चौथ्या खांबामधला गर्डर खाली पडल्यामुळे हा भीषण अपघात घडला. या गर्डरनर हे सर्व मजूर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची तब्बल 104 मीटर म्हणजेच 341 फूट एवढी आहे. म्हणजेच पुलाची उंची कुतुबमिनारपेक्षा जास्त आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ कामगारांचा मृत्यू झाला असला तरी अजूनही काही कामगारा दबले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

Karjat : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी; मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कलाकार मग्न

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी