राष्ट्रीय

फौजदारी कायदा बदलणारी विधेयके संसदेत दाखल ;केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फौजदारी कायद्यात सुधारणेशी संबंधित तीन विधेयके लोकसभेत मांडली.

Swapnil S

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या १२ व्या दिवशी मंगळवारी ४९ खासदारांचे निलंबन झाले. आतापर्यंत विरोधी पक्षांचे ९५ खासदार निलंबित झाले आहेत. विरोधी पक्षांचे संख्याबळ एकतृतीयांश राहिले आहे. त्याचवेळी केंद्र सरकारने तीन फौजदारी कायदे बदलण्यासाठी तीन विधेयक लोकसभेत मांडली आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फौजदारी कायद्यात सुधारणेशी संबंधित तीन विधेयके लोकसभेत मांडली. भारतीय दंडसंहितेऐवजी भारतीय न्याय संहिता विधेयक २०२३, सीआरपीसीच्या ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व पुरावा कायद्याऐवजी भारतीय साक्ष विधेयक २०२३ लोकसभेत मांडले.

ही विधेयके ऑगस्टमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत मांडली होती. त्यानंतर तिच्यावर विचार करण्यासाठी संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवली. गेल्या आठवड्यात या विधेयकांचे नवीन प्रारूप सादर केले.

फौजदारी कायद्यात सुधारणा करण्यासाठी ही तीन विधेयके मांडली आहेत.

विरोधी पक्षांनी आरोप केला की, देशात हुकूमशाही सुरू आहे. कोणत्याही चर्चेशिवाय सरकार महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर करू इच्छिते.

१० एप्रिलपासून टोलवर कॅश बंद! FASTag-यूपीआय अनिवार्य; काय आहेत नवे नियम? जाणून घ्या

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकाचे A4 गेट तात्पुरते बंद; कधी होणार सुरू? जाणून घ्या वेळ

Thane : अंधश्रद्धेचा गैरफायदा! 'काळ्या जादूचा प्रभाव दूर करतो' म्हणत कुटुंबाला १.६६ कोटींचा गंडा

ठाणे महापालिकेचा महसूल १,९०९ कोटींवर; करवसुलीत आघाडी कायम

ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन