राष्ट्रीय

पराळी जाळल्यास दुप्पट दंड; केंद्र सरकारचा आदेश

दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील प्रदूषण वाढत असल्याने पराळी जाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या दंडामध्ये केंद्र सरकारने दुप्पट वाढ केली आहे. ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील प्रदूषण वाढत असल्याने पराळी जाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या दंडामध्ये केंद्र सरकारने दुप्पट वाढ केली आहे. ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

सरकारच्या अधिसूचनेनुसार, दोन एकरपेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना २५०० ऐवजी ५ हजार रुपये दंड, २ ते ५ एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ ऐवजी १० हजार रुपये दंड भरावा लागेल.

वाहनांचे प्रदूषण, पराळी जाळणे, फटाके वाजवणे व स्थानिक प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवा प्रदूषित झाली आहे. शेतकऱ्यांनी पराळी जाळल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदूषणात वाढ झालेली दिसत आहे, असे दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने सांगितले.

१० एप्रिलपासून टोलवर कॅश बंद! FASTag-यूपीआय अनिवार्य; काय आहेत नवे नियम? जाणून घ्या

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकाचे A4 गेट तात्पुरते बंद; कधी होणार सुरू? जाणून घ्या वेळ

Thane : अंधश्रद्धेचा गैरफायदा! 'काळ्या जादूचा प्रभाव दूर करतो' म्हणत कुटुंबाला १.६६ कोटींचा गंडा

ठाणे महापालिकेचा महसूल १,९०९ कोटींवर; करवसुलीत आघाडी कायम

ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन