राष्ट्रीय

पराळी जाळल्यास दुप्पट दंड; केंद्र सरकारचा आदेश

दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील प्रदूषण वाढत असल्याने पराळी जाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या दंडामध्ये केंद्र सरकारने दुप्पट वाढ केली आहे. ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील प्रदूषण वाढत असल्याने पराळी जाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या दंडामध्ये केंद्र सरकारने दुप्पट वाढ केली आहे. ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

सरकारच्या अधिसूचनेनुसार, दोन एकरपेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना २५०० ऐवजी ५ हजार रुपये दंड, २ ते ५ एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ ऐवजी १० हजार रुपये दंड भरावा लागेल.

वाहनांचे प्रदूषण, पराळी जाळणे, फटाके वाजवणे व स्थानिक प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवा प्रदूषित झाली आहे. शेतकऱ्यांनी पराळी जाळल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदूषणात वाढ झालेली दिसत आहे, असे दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने सांगितले.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल