राष्ट्रीय

कडाक्याच्या थंडीचा करावा लागणार सामना, येत्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट

Swapnil S

मुंबई : उत्तर महाराष्ट्रासह मध्य भारतात ५ ते ११ जानेवारी दरम्यान थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे काही दिवस कडाक्याच्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, रात्रीचे तापमान कमी होऊ शकते, ज्यामुळे मध्य भारताचा काही भाग, मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग तसेच हरयाणा आणि राजस्थानच्या आसपासच्या भागात थंडी वाढू शकते. त्याचप्रमाणे दिवसाचे तापमान हे सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. लक्षद्वीप परिसरात पावसाची शक्यता आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस