राष्ट्रीय

घटनादुरुस्तीविना एक देश, एक निवडणूक अशक्य काँग्रेसचा दावा

काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी एक देश, एक निवडणूक अंमलात आणण्यासाठी घटनादुरुस्ती करावीच लागेल

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी एक देश, एक निवडणूक अंमलात आणण्यासाठी घटनादुरुस्ती करावीच लागेल. त्याशिवाय हे अशक्य आहे, असे मत सोमवारी व्यक्त केले. पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. तसेच संसदेच्या १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनापूर्वी काँग्रेस पक्ष संसदीय धोरण गटाची बैठक मंगळवारी सायंकाळी ५ वाजता १० जनपथ येथे भरवणार आहे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील समविचारी विरोधी पक्षांची बैठक आपल्या निवासस्थानीच बोलावणार आहेत. तेव्हा संसदेच्या आगामी सत्रातील रणनीतीविषयी विचारविनिमय करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनीच ही माहिती दिली आहे. दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी एक देश, एक निवडणूक हा देशाच्या गणराज्य पद्धतीवरच घाला आहे, असे मत व्यक्त केले आहे.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली