रांची : झारखंडमधील चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये पक्षाच्या चार आमदारांना मंत्री म्हणून समाविष्ट केल्याबद्दल काँग्रेस आमदारांच्या एका वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंत्र्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांची नियुक्ती न केल्यास २३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनावर बहिष्काराची आणि जयपूरला जाण्याची धमकी १२ आमदारांनी दिली आहे.
झामुमो नेतृत्वाखालील आघाडीचे ८१ सदस्यीय विधानसभेत ४७ आमदार (झामुमो-२९, १७ आणि एक राजद) आहेत. आलमगीर आलम, रामेश्वर ओराव, बन्ना गुप्ता आणि बादल पत्रलेख यांना पुन्हा मंत्रिपद देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर नाराज आमदार शुक्रवारी शपथविधी समारंभाआधी बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.