राष्ट्रीय

वर्षभरात ३५० एनसीसी कॅडेट्स अग्निवीर म्हणून नौदलात सामील!

Swapnil S

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात सुमारे ३५० एनसीसी कॅडेट्स अग्निवीर म्हणून भारतीय नौदलात सामील झाले, असे नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी शनिवारी सांगितले. नवी दिल्लीतील एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले की, एनसीसीने (नॅशनल कॅडेट कोअर) सातत्याने समर्पित आणि दृढनिश्चयी शूरवीर तयार केले आहेत, जे भारताच्या सेवेत उत्कृष्ट मानले जात आहेत. यात मोठ्या संख्येने महिला कॅडेट्स महिला अग्निवीर म्हणून नौदलात सामील झाल्या आहेत. कार्यक्रमात त्यांनी नॅशनल कॅडेट कोअरच्या आर. डी. कॅम्पमधील सहभागींची परेड पाहिली. ध्वज क्षेत्राला भेट दिली आणि दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील काही कॅडेट्सशी संवाद साधला. सरकारने २०२२ मध्ये अग्निपथ योजना सुरू केली. त्या अंतर्गत अग्निवीरांची नोंदणी केली जाते. ॲडमिरल कुमार यांनी आपल्या भाषणात एनसीसीच्या वारशाची आणि कॅडेट्समध्ये रुजलेल्या मूल्यांची प्रशंसा केली. आमच्या अनेक उत्कृष्ट अधिकारी आणि खलाशांनी एनसीसी कॅडेट म्हणून त्यांचा प्रवास सुरू केला. त्यामुळे, गेल्या एका वर्षात, सुमारे ३५० कॅडेट अग्निवीर म्हणून नौदलात सामील झाले आहेत. येत्या काही वर्षांत त्यांच्यापैकी आणखी बरेच जण सामील होतील, याची आम्ही वाट पाहत आहोत, असे ते म्हणाले

अग्निवीर म्हणून मोठ्या संख्येने महिला कॅडेट्स सामील झाल्या आहेत. आम्ही पुढील वर्षांमध्ये त्यांच्यापैकी आणखी कॅडेट्स या 'नवसेने'मध्ये सामील होण्याची अपेक्षा करतो. तुमचे कर्तव्य आणि ते वेगळेपणाने पार पाडा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

"काँग्रेसनं एकाच नेत्याला १७ वेळा लॉन्च केलं, पण प्रत्येकवेळी तो फेल गेला..."फडणवीसांची राहुल गांधींवर टीका

"उद्धव ठाकरे जेलमध्ये असतील..." अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

"ज्यावेळी पक्ष धोक्यात येतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये जातात," फडणवीसांची शरद पवारांवर टीका...

कराडसह साताऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी: वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान