एक्स
राष्ट्रीय

शेतकऱ्यांचा शंभू सीमा ते दिल्ली मोर्चा स्थगित

पंजाबमधील १०१ आंदोलक शेतकरी रविवारी दुपारी शंभू सीमेवरून दिल्लीला जाण्यासाठी निघाले असता हरयाणा पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या वादावादीत ८ शेतकरी जखमी झाले. त्यामुळे हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.

Swapnil S

शंभू बॉर्डर (पटियाला) : पंजाबमधील १०१ आंदोलक शेतकरी रविवारी दुपारी शंभू सीमेवरून दिल्लीला जाण्यासाठी निघाले असता हरयाणा पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या वादावादीत ८ शेतकरी जखमी झाले. त्यामुळे हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.

हरयाणा पोलिसांनी शेतकऱ्यांकडून दिल्लीला जाण्यासाठी परवानगीचे पत्र मागितले व परवानगीशिवाय दिल्लीला जाता येणार नाही, असे सांगितल्याने तणाव निर्माण झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचा माराही करण्यात आला.

यावेळी ८ शेतकरी जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याला चंदिगड पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले आहे. यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला. आता बैठक घेऊन रणनीती बनवू, असे शेतकरी नेते पंढेर यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा