राष्ट्रीय

पाकमधून आलेल्या हिंदूंवर हेरगिरीसाठी बळजबरी, भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून भंडाफोड

महाराष्ट्रात राहणारे काही पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी बळजबरीने हेरगिरी करत असल्याची धक्कादायक बाब भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राहणारे काही पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी बळजबरीने हेरगिरी करत असल्याची धक्कादायक बाब भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणली आहे. काही पाकिस्तानी हिंदू महाराष्ट्रात राहतात, पण ते धार्मिक, सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अधूनमधून पाकिस्तानला भेट देतात. तेथे पाकिस्तानी दहशतवादी संघटना व गुप्तहेर संघटना आयएसआय या हिंदूना हेरगिरी करण्याच्या कामी नेमतात, अशी माहिती समोर आली आहे. अशी हिंदू कुटुंबे भारतात राहून संशयास्पद कारवाया करतात, तसेच भारताची संवेदनशील माहिती पाकच्या आयएसआय संघटना आणि दहशतवाद्यांना पुरवतात, असे उघड झाले आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासाअंती आयएसआयच्या कामाची एक पद्धत उघड झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात राहणारे अनेक पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानात व्हिजिटर व्हिसा मिळण्यासाठी अर्ज करीत असतात. पाकिस्तानमधील नातेवार्इक यांना भेटण्यासाठी, तेथे कार्यक्रमास उपस्थित राहाण्यासाठी, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना पाक भेटीवर जायचे असते. पाकिस्तानात पोहोचल्यानंतर आयएसआयचे व दहशतवाद्यांचे हस्तक त्वरित या हिंदूना गाठतात. त्यांना महाराष्ट्रात गेल्यानंतर कशा प्रकारे माहिती जमा करायची, कोणती माहिती जमा करायची, याबाबत काटेकोर प्रशिक्षण देतात व त्यांच्या मनावर हे काम बिंबवतात. जे या कामाला नकार देतात, त्या हिंदूंच्या पाकिस्तानातील कुटुंबियांना छळण्याची धमकी या पाकिस्तानी संघटना देतात. अशा प्रकारे ब्लॅकमेल व मनवळणी या माध्यमातून या हिंदूंना पाकिस्तानी हेरगिरी करण्यासाठी भाग पाडण्यात येते. तयार झालेल्या हिंदूंना भारतीय सीम कार्ड, व्हॉटसअॅप वगैरे सुविधा दिल्या जातात. भारतीय लष्कराची ठिकाणे, लष्कराच्या हालचाली, महत्वाची स्थळे, गुगल लोकेशन, प्रत्यक्ष लोकेशन आणि संवेदनशील ठिकाणे या बाबतची माहिती या हिंदू कुटुंबाकडून मिळवली जाते.

अलिकडेच ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये गुजरात एटीएसने तारापूर येथून लाभशंकर महेश्वारी याला अटक केले होते. त्याच्या चौकशीदरम्यान अशाच प्रकारची हेरगिरीची पद्धत उघडकीस आली होती. भारती लष्कराच्या हेरांनी लाभशंकर महेश्वरीची टीप एटीएसला दिली होती. तेव्हा त्याने आपण मूळचा पाकिस्तानी असून २००५ साली भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे मान्य केले होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली