राष्ट्रीय

फरार उद्योगपती विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावली शिक्षा

सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवले होते.

वृत्तसंस्था

अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फरार उद्योगपती विजय मल्ल्याला चार महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्याने न्यायालयाने त्याला दोन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय परदेशात हस्तांतरित केलेले ४० दशलक्ष डॉलर्सही चार आठवड्यात भरण्यास सांगितले होते. असे न केल्यास मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती यू यू ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ४० दशलक्ष डॉलर्स त्यांच्या मुलांना हस्तांतरित केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवले होते. मालमत्तेचा अचूक तपशील न दिल्याने मल्ल्याला २०१७ मध्ये न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाच्या या निर्णयावर मल्ल्या यांनी दाखल केलेली पुनर्विलोकन याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

१०फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला त्याच्याविरुद्धच्या अवमान प्रकरणात वैयक्तिकरित्या किंवा वकिलामार्फत हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांची अंतिम संधी दिली होती. न्यायालयाने १० मार्च रोजी मल्ल्याच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता.

बंगालमध्ये 'कमळ', तमिळनाडूत 'विजय'; आसाममध्ये BJP ची हॅटट्रिक; दक्षिण मात्र अजूनही दूरच, केरळने डाव्यांना डावलले

सुनेत्रा पवारांचा विक्रम! बारामतीत दोन लाख १८ हजारांच्या फरकाने ऐतिहासिक विजय; राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले विजयी

'गंगोत्री ते गंगासागरापर्यंत' फुलले कमळ; जल्लोषाच्या सभेत मोदींचे प्रतिपादन

स्टालिन, विजय, ममतांशी राहुल यांनी साधला संवाद

जागतिक दमा दिवस २०२६ : उष्णतेच्या लाटा वाढवत आहेत दम्याचा त्रास; रुग्णांनी काय काळजी घ्यावी?