राष्ट्रीय

शेतकऱ्यांशी सरकारने त्वरेने चर्चा करावी; भूपिंद्रसिंग हुडा यांचे आवाहन

केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्वरेने चर्चा करावी. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने निर्माण झालेली स्थिती चिंताजनक असून शेतकऱ्यांनीही शांतता राखावी

Swapnil S

चंदिगड : केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्वरेने चर्चा करावी. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने निर्माण झालेली स्थिती चिंताजनक असून शेतकऱ्यांनीही शांतता राखावी, असे आवाहन हरयाणातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते भूपिंद्रसिंग हुडा यांनी केले आहे. हुडा यांनी राज्य विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना सांगितले की, परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. सरकारने शेतकऱ्यांशी ताबडतोब चर्चा करून प्रश्न सोडवावा.

पंजाब-हरयाणा सीमेवरील दोन निषेध स्थळांपैकी एक असलेल्या खनौरी येथे झालेल्या चकमकीत एक आंदोलक ठार आणि सुमारे १२ पोलीस कर्मचारी जखमी झाल्यानंतर बुधवारी शेतकरी नेत्यांनी 'दिल्ली चलो' मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित केला.

पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी आणि शेतकरी कर्जमाफी यासह त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या विराम दरम्यान हजारो शेतकरी दोन सीमा बिंदूंवर तळ ठोकून राहतील.

सरकारचे तंत्रकठोर नियम! एआयसाठी ‘कायमस्वरूपी’ लेबल; ऑनलाइन गेमिंगसाठीही नवीन नियमावली जाहीर

मुंबई-गोवा महामार्गावर जूनपासून टोल वसुली? ओसरगाव टोल नाक्याची निविदा प्रसिद्ध, किती पैसे मोजावे लागणार?

US-Iran Ceasefire: इराणसोबतचा शस्त्रसंधीचा करार अनिश्चित काळासाठी वाढवण्याची ट्रम्प यांची घोषणा; आर्थिक नाकेबंदी मात्र कायम

Mumbai : राणीबागेत लवकरच सिंह गर्जना घुमणार; महापौर गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयाची पाहणी करणार

रोहित-धोनीचं आज पुनरागमन? वानखेडेवर मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स भिडणार; आयुष म्हात्रेच्या जागी 'या' तरुण खेळाडूची वर्णी?