राष्ट्रीय

शेतकऱ्यांशी सरकारने त्वरेने चर्चा करावी; भूपिंद्रसिंग हुडा यांचे आवाहन

Swapnil S

चंदिगड : केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्वरेने चर्चा करावी. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने निर्माण झालेली स्थिती चिंताजनक असून शेतकऱ्यांनीही शांतता राखावी, असे आवाहन हरयाणातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते भूपिंद्रसिंग हुडा यांनी केले आहे. हुडा यांनी राज्य विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना सांगितले की, परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. सरकारने शेतकऱ्यांशी ताबडतोब चर्चा करून प्रश्न सोडवावा.

पंजाब-हरयाणा सीमेवरील दोन निषेध स्थळांपैकी एक असलेल्या खनौरी येथे झालेल्या चकमकीत एक आंदोलक ठार आणि सुमारे १२ पोलीस कर्मचारी जखमी झाल्यानंतर बुधवारी शेतकरी नेत्यांनी 'दिल्ली चलो' मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित केला.

पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी आणि शेतकरी कर्जमाफी यासह त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या विराम दरम्यान हजारो शेतकरी दोन सीमा बिंदूंवर तळ ठोकून राहतील.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त