राष्ट्रीय

शेतकऱ्यांशी सरकारने त्वरेने चर्चा करावी; भूपिंद्रसिंग हुडा यांचे आवाहन

केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्वरेने चर्चा करावी. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने निर्माण झालेली स्थिती चिंताजनक असून शेतकऱ्यांनीही शांतता राखावी

Swapnil S

चंदिगड : केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्वरेने चर्चा करावी. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने निर्माण झालेली स्थिती चिंताजनक असून शेतकऱ्यांनीही शांतता राखावी, असे आवाहन हरयाणातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते भूपिंद्रसिंग हुडा यांनी केले आहे. हुडा यांनी राज्य विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना सांगितले की, परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. सरकारने शेतकऱ्यांशी ताबडतोब चर्चा करून प्रश्न सोडवावा.

पंजाब-हरयाणा सीमेवरील दोन निषेध स्थळांपैकी एक असलेल्या खनौरी येथे झालेल्या चकमकीत एक आंदोलक ठार आणि सुमारे १२ पोलीस कर्मचारी जखमी झाल्यानंतर बुधवारी शेतकरी नेत्यांनी 'दिल्ली चलो' मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित केला.

पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी आणि शेतकरी कर्जमाफी यासह त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या विराम दरम्यान हजारो शेतकरी दोन सीमा बिंदूंवर तळ ठोकून राहतील.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक