राष्ट्रीय

शेतकऱ्यांशी सरकारने त्वरेने चर्चा करावी; भूपिंद्रसिंग हुडा यांचे आवाहन

केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्वरेने चर्चा करावी. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने निर्माण झालेली स्थिती चिंताजनक असून शेतकऱ्यांनीही शांतता राखावी

Swapnil S

चंदिगड : केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्वरेने चर्चा करावी. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने निर्माण झालेली स्थिती चिंताजनक असून शेतकऱ्यांनीही शांतता राखावी, असे आवाहन हरयाणातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते भूपिंद्रसिंग हुडा यांनी केले आहे. हुडा यांनी राज्य विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना सांगितले की, परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. सरकारने शेतकऱ्यांशी ताबडतोब चर्चा करून प्रश्न सोडवावा.

पंजाब-हरयाणा सीमेवरील दोन निषेध स्थळांपैकी एक असलेल्या खनौरी येथे झालेल्या चकमकीत एक आंदोलक ठार आणि सुमारे १२ पोलीस कर्मचारी जखमी झाल्यानंतर बुधवारी शेतकरी नेत्यांनी 'दिल्ली चलो' मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित केला.

पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी आणि शेतकरी कर्जमाफी यासह त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या विराम दरम्यान हजारो शेतकरी दोन सीमा बिंदूंवर तळ ठोकून राहतील.

ठाण्यात मंगळवारपासून १२ दिवस २०% पाणी कपात; न्युटिक गेट दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा कमी, बघा पाणी शटडाऊन वेळापत्रक

महाराष्ट्र सदन घोटाळा : मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; ACBनंतर आता EDच्या प्रकरणातही दिलासा

...तर पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांचे पगार रोखू; हायकोर्टाची तंबी: प्रदूषण रोखण्यात BMC प्रशासन अपयशी!

Mumbai : सपा, राष्ट्रवादी गटाला समितीतही स्थान नाही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच समिती; एमआयएमला लॉटरी

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका : इशान, सूर्याचा झंझावात; न्यूझीलंडवर सहज मात; दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून शानदार विजय