राष्ट्रीय

हल्द्वानी हिंसाचार: उत्तराखंड सरकारने केंद्राकडे अतिरिक्त फौजफाटा मागितला

Swapnil S

हल्द्वानी : उत्तराखंड सरकारने हल्द्वानी येथे ८ फेब्रुवारी रोजी बेकायदेशीर मदरसा पाडल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे आणखी केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्यांची मागणी गेली आहे.

या संबंधात सरकारी अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, जमावाच्या हिंसाचाराचा केंद्रबिंदू असलेल्या बनभूलपुरा भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाच्या प्रत्येकी १०० कर्मचारी असलेल्या चार कंपन्या गृह मंत्रालयाकडून मागविण्यात आल्या आहेत. राज्याच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी ही मागणी केंद्राकडे पाठवली होती. बनभूलपुरा भागात संचारबंदी कायम आहे, परंतु शहराच्या बाहेरील भागात ती उठवण्यात आली आहे. जवळपास ११०० सुरक्षा कर्मचारी आधीच शहरात तैनात आहेत. बनभूलपुरा येथे अजूनही दुकाने बंद असून रस्ते सुनसान आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त