राष्ट्रीय

कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला तर मी त्याला राजीनामा देऊ नका असे सांगू का? - भगतसिंग कोश्यारी

कायद्याची जाण असलेलेच या निकालावर भाष्य करतील. मी कायद्याचा विद्यार्थी नाही. मला संसदीय कामकाजाची माहिती आहे.

नवशक्ती Web Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर न्यायालयाने मोठा निकाल दिला असून राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर तोंडसुख घेतले. राज्यपालांनी घेतलेले निर्णय कायद्यानुसार नव्हते, असे स्पष्ट मत न्यायालयाने आपल्या निकालात नोंदवले आहे. विरोधी पक्षांनी यावर टीका सुरू केली असताना खुद्द भगतसिंग कोश्यारी यांनी मीडियाशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा बहुमत चाचणीचा निर्णय चुकीचा होता. आता त्याचे काय करायचे? न्यायालयाने यासंदर्भात सर्व काही सांगितले आहे. 

भगतसिंह कोश्यारी यांनी असेही नमूद केले की, “न्यायालयाच्या निकालाबद्दल मला काहीही बोलायचे नाही”. तीन महिन्यांपूर्वी राज्यपालपदावरून बाजूला झालो. मी स्वत:ला राजकीय विषयांपासून दूर ठेवले आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होते. त्यावर न्यायालयाने निकाल दिला आहे. कायद्याची जाण असलेलेच या निकालावर भाष्य करतील. मी कायद्याचा विद्यार्थी नाही. मला संसदीय कामकाजाची माहिती आहे. त्यावेळी मी जे पाऊल उचलले ते विचारपूर्वक उचलले. कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला तर मी त्याला राजीनामा देऊ नका असे सांगू का? सर्वोच्च न्यायालयाने काही सांगितले असेल तर त्याचे विश्लेषण करणे हे विश्लेषकाचे काम आहे, माझे नाही,” कोश्यारी म्हणाले.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल