राष्ट्रीय

भारताने इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वी गाठले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की, जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि वापरकर्ता देश असलेल्या भारताने १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वी गाठले आहे.

१० टक्के इथेनॉलसह मिश्रित पेट्रोल पुरवण्याचे लक्ष्य नोव्हेंबर २०२२ च्या वेळापत्रकाच्या आधी जूनमध्ये गाठले गेले. लवकर मिळालेल्या यशामुळे सरकारला प्रोत्साहन मिळाले आणि त्यामुळे २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पीटीआयमधील एका वृत्तानुसार, पंतप्रधानांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने कार्बन उत्सर्जनात घट झाली आहे तसेच ५० हजार कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली आहे. उसाचे अर्क, धान्य आणि शेतातील कचऱ्यापासून इथेनॉल तयार केल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा पर्यायी स्रोतही मिळाला.

ऊर्जा स्वातंत्र्य मिळवून अधिक स्वावलंबी देश होण्याविषयी मोदी बोलले. "सौर ऊर्जेपासून ते मिशन हायड्रोजन ते इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यापर्यंत. तसेच इथेनॉल इंधनावरील कार आपल्याला चालवावी लागेल. आम्हाला ऊर्जा स्वातंत्र्यासाठी हे उपक्रम पुढील स्तरावर नेण्याची गरज आहे," असे त्यांनी अहवालात नमूद केले आहे.

इथेनॉल उत्पादनात भारत पाचव्या क्रमांकावर

अमेरिका, ब्राझील, युरोपियन युनियन आणि चीन नंतर भारत पाचव्या क्रमांकाचा इथेनॉल उत्पादक देश आहे. इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी ब्राझील आणि भारतासारखे देश ते पेट्रोलमध्येही मिसळतात. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण गाठण्यासाठी पुढील मैलाचा दगड गाठला जाईल, असा अंदाज आहे की, भारताची वार्षिक अंदाजे ४ अब्ज डॉलर्सची बचत होईल. तेल मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एप्रिलपासून सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या साडेतीन महिन्यांत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून २० लाख टन कच्च्या तेलाची भरपाई करण्यात आली आहे.

नैसर्गिक शेतीमुळे भारत आत्मनिर्भर बनेल

नैसर्गिक आणि रसायनमुक्त शेतीमुळे भारत कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी लालकिल्ल्यावरुन केलेल्या भाषणात केले. शेतीमध्ये पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा, असेही ते म्हणाले. आत्मनिर्भर भारत हा फक्त सरकारचा कार्यक्रम नसून लोकचळवळ आहे आणि तिला बळ मिळणे गरजेचे आहे. देशातील नॅनो फॅक्टरीज आशेचा नवा किरण आहे. परंतु नैसर्गिक शेती, रसायनमुक्त शेतीमुळे भारताच्या आत्मनिर्भर होण्याच्या आशेला बळ मिळेल. भारत सध्या अन्नधान्याबाबत आत्मनिर्भर बनला असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, अन्य देशांच्या अन्नधान्याची गरज आपण भागवण्यासाठी निर्यात करत आहोत.

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप

Video : क्रिकेट खेळताना गुप्तांगाला लागला बॉल, पुण्यातील ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

"तो मुलाच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत होता, आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची योजना आखतोय": पूंछ हल्ल्यातील शहीद जवानाचे नातलग

'ही' परवडणारी कार देते 25 Kmplचं भन्नाट मायलेज! ग्राहकांना लावलंय वेड