भारतीय विमान कंपन्यांना ३८ हजार कोटींचा तोटा होणार; यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 'इक्रा'चा अंदाज  प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

भारतीय विमान कंपन्यांना ३८ हजार कोटींचा तोटा होणार; यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 'इक्रा'चा अंदाज

भारताचे विमान क्षेत्र सध्या तीव्र आर्थिक दबाव आणि अस्थिरतेच्या काळातून जात आहे. येत्या वर्षभरात विमान कंपन्यांना ३६ ते ३८ हजार कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो, असा अंदाज पतमान संस्था ‘इक्रा’ने वर्तवला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचे विमान क्षेत्र सध्या तीव्र आर्थिक दबाव आणि अस्थिरतेच्या काळातून जात आहे. येत्या वर्षभरात विमान कंपन्यांना ३६ ते ३८ हजार कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो, असा अंदाज पतमान संस्था ‘इक्रा’ने वर्तवला आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन, महागडे जेट इंधन आणि पश्चिम आशियातील संकटामुळे या उद्योगाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. ‘इक्रा’च्या मते, चांगल्या प्रवासी संख्येच्या जोरावर २०२६-२७ मध्ये विमान कंपन्यांचा तोटा कमी होऊन ११-१२ हजार कोटी रुपयांवर येईल, परंतु आता परिस्थिती बदलली आहे.

पश्चिम आशियातील संकटामुळे विमान क्षेत्राच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. या वादामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम विमान कंपन्यांचा खर्च आणि तिकीट दरांवर झाला आहे. तिकीट दर वाढल्यामुळे आणि महागाईमुळे लोकांनी अनावश्यक खर्चात कपात केली आहे, ज्याचा फटका हवाई प्रवास करणाऱ्यांच्या संख्येवरही स्पष्टपणे दिसत आहे.

तोट्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • रुपयातील घसरण: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणात परकीय चलन नुकसान सोसावे लागत आहे.

  • लीज रेंटलचा वाढता बोजा: विमान कंपन्यांना नवीन विमानांचा पुरवठा सतत मिळत आहे. ज्यामुळे त्यांचे भाडे वाढले आहे.

  • खर्च आणि भाड्यातील असंतुलन: कंपन्यांचा परिचालन खर्च वेगाने वाढला आहे, परंतु त्या या महागाईचा संपूर्ण भार विमान भाडे वाढवून प्रवाशांवर टाकू शकत नाहीत. याआधी, गेल्या आर्थिक वर्षातही भारतीय विमान उद्योगाचा एकूण तोटा अंदाजित १७-१८ हजार कोटी पेक्षा ३२ ते ३४ हजार कोटी रुपये होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नसरापूर अत्याचार प्रकरण : आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर नारायणगावकर कुटुंबीयांची नाराजी; चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी

नोएडातील उंच इमारतीत भीषण आग; एसीचा स्फोट झाल्याचा संशय, Video

'यूपीआय'ला AI चे बळ मिळणार; रोज १०० कोटी व्यवहाराचे लक्ष्य; एनपीसीआयचे सीईओ दिलीप आसबे यांची माहिती

ठाणे-पालघर जिल्हा बँकेत सहकार पॅनलची एकहाती सत्ता; २१ पैकी १५ जागांवर विजय संपादन; परिवर्तन पॅनलचा पराभव