प्रातिनिधिक छायाचित्र  
राष्ट्रीय

सामानाच्या वजनाची मर्यादा ओलांडल्यास आता रेल्वेही शुल्क आकारणार

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आता विमानाप्रमाणेच मर्यादित वजनापेक्षा अधिकचे साहित्य नेल्यास त्याचे शुल्क भरावे लागणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आता विमानाप्रमाणेच मर्यादित वजनापेक्षा अधिकचे साहित्य नेल्यास त्याचे शुल्क भरावे लागणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत स्पष्ट केले.

विमान प्रवास करण्यापूर्वी तुम्ही नेत असलेल्या साहित्याचे वजन तपासले जाते. मर्यादेपक्षा जास्त वजन असल्यास त्यावर वाढीव शुल्क आकारले जाते. परंतु आता रेल्वेने प्रवास करतानाही ही काळजी घ्यावी लागणार आहे. खासदार वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी यांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. ज्यात विमान प्रवासासारखे रेल्वे प्रवास करतानाही प्रवाशांसाठी बॅगच्या वजनाचा नियम लागू केला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, सध्या विविध श्रेणीनुसार प्रवाशांकडून ट्रेनमधून घेऊन जाणाऱ्या साहित्यावर कमाल वजन निश्चित केले आहे. प्रत्येक श्रेणीत मोफत सामान आणि कमाल मर्यादा ठरवण्यात आली आहे. सेकंड क्लासमधून प्रवास करणाऱ्यांसाठी ३५ किलोपर्यंत सामान मोफत नेता येईल. त्यानंतर ७० किलोपर्यंत सामानावर शुल्क आकारले जातील. स्लीपर क्लासच्या प्रवाशांसाठी ४० किलो मोफत सामान नेण्याची परवानगी आहे. त्यावर ८० किलोपर्यंत सामानावर शुल्क आकारले जाणार आहे.

एसी थ्री टियर आणि चेअर कारच्या प्रवाशांसाठी ४० किलोपर्यंत सामान मोफत नेण्याची परवानगी आहे. फर्स्ट क्लास आणि एसी टू टियरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५० किलोपर्यंत सामान नेता येईल. त्यांना १०० किलोपर्यंत सामान नेण्याची परवानगी आहे. अतिरिक्त सामानावर शुल्क आकारले जाणार आहे. मोफत मर्यादेपेक्षा अधिकचे सामान कोचमधून घेऊन जात असाल तर त्यासाठी निर्धारित दरापेक्षा दीड पट जास्त शुल्क भरावे लागेल असेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, प्रवाशांना डब्यांमध्ये वैयक्तिक सामान म्हणून १०० सेमी x ६० सेमी x २५ सेमी (लांबी x रुंदी x उंची) पर्यंतच्या ट्रंक, सुटकेस आणि बॉक्स नेण्याची परवानगी आहे. यापैकी कोणत्याही आकारापेक्षा जास्त सामान कोचमध्ये ठेवण्याची परवानगी नाही, असेही वैष्णव यांनी सांगितले.

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन