राष्ट्रीय

भारताची लोकसंख्या झाली १४४ कोटी; ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’चा अहवाल

भारतातील अंदाजे २४ टक्के लोकसंख्या ० ते १४ वयोगटातील असून १७ टक्के लोक १० ते १९ वयोगटातील आहेत, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे

Swapnil S

संयुक्त राष्ट्रे : युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या (यूनएफपीए) अहवालानुसार, भारताची लोकसंख्या अंदाजे १४४ कोटींपर्यंत वाढली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे १४४.७ कोटी लोकसंख्येसह भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे, तर चीनची लोकसंख्या सुमारे १४२.५ कोटी आहे. भारताची लोकसंख्या ७७ वर्षांत दुप्पट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारतातील अंदाजे २४ टक्के लोकसंख्या ० ते १४ वयोगटातील असून १७ टक्के लोक १० ते १९ वयोगटातील आहेत, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. १० ते २४ वयोगटातील लोक २६ टक्के असण्याचा अंदाज आहे, तर १५ ते ६४ वयोगटातील लोकसंख्या ६८ टक्के आहे. २०११ मध्ये झालेल्या शेवटच्या जनगणनेदरम्यान भारताची लोकसंख्या १२१ कोटी होती. देशात पुरुषांचे आयुर्मान ७१ वर्षे आणि महिलांचे ७४ वर्षे आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, भारतातील माता मृत्यू मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

ई-२० इंधनाचा वापर सुरक्षितच; वाहन विम्याच्या वैधतेवर परिणाम होणार नसल्याचा सरकारचा दावा

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा