राष्ट्रीय

भारताची लोकसंख्या झाली १४४ कोटी; ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’चा अहवाल

भारतातील अंदाजे २४ टक्के लोकसंख्या ० ते १४ वयोगटातील असून १७ टक्के लोक १० ते १९ वयोगटातील आहेत, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे

Swapnil S

संयुक्त राष्ट्रे : युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या (यूनएफपीए) अहवालानुसार, भारताची लोकसंख्या अंदाजे १४४ कोटींपर्यंत वाढली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे १४४.७ कोटी लोकसंख्येसह भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे, तर चीनची लोकसंख्या सुमारे १४२.५ कोटी आहे. भारताची लोकसंख्या ७७ वर्षांत दुप्पट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारतातील अंदाजे २४ टक्के लोकसंख्या ० ते १४ वयोगटातील असून १७ टक्के लोक १० ते १९ वयोगटातील आहेत, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. १० ते २४ वयोगटातील लोक २६ टक्के असण्याचा अंदाज आहे, तर १५ ते ६४ वयोगटातील लोकसंख्या ६८ टक्के आहे. २०११ मध्ये झालेल्या शेवटच्या जनगणनेदरम्यान भारताची लोकसंख्या १२१ कोटी होती. देशात पुरुषांचे आयुर्मान ७१ वर्षे आणि महिलांचे ७४ वर्षे आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, भारतातील माता मृत्यू मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे