संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

IndiGo च्या विमान उड्डाणात १० टक्के कपात; गैरसोय टाळण्यासाठी केंद्राचा निर्णय

मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवर इंडिगो एअरलाइन्सच्या कामकाजात सातत्याने येत असलेल्या अडथळ्यांमुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इंडिगोच्या हिवाळी उड्डाण वेळापत्रकात १० टक्के कपात करण्याचे आदेश दिले. याबाबतची माहिती केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवर इंडिगो एअरलाइन्सच्या कामकाजात सातत्याने येत असलेल्या अडथळ्यांमुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इंडिगोच्या हिवाळी उड्डाण वेळापत्रकात १० टक्के कपात करण्याचे आदेश दिले. याबाबतची माहिती केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली.

नवीन फ्लाइट ड्युटी टाइम नियम आणि क्रू मेंबर्सच्या कमतरतेमुळे इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाणांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहे. यामुळे विमानतळांवर गोंधळ निर्माण होऊन लाखो प्रवासी अडकले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोला स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, जोपर्यंत त्यांचे कर्मचारी आणि कामकाज स्थिर होत नाही, तोपर्यंत त्यांनी कपात केलेल्या वेळापत्रकानुसारच काम करावे. कपात करण्यात येणाऱ्या उड्डाणांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

उड्डाणांमध्ये वाढीचे आदेश

इंडिगोमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी ‘डीजीसीए’ने एअर इंडिया, अकासा एअर आणि स्पाइसजेटसारख्या विमान कंपन्यांना त्यांच्या उड्डाणामध्ये वाढ करण्याचे आवाहन केले. एअर इंडियाने अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी देशांतर्गत मार्गांवर वाइड-बॉडी विमाने तैनात करण्यास सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गैरसोयीच्या काळात खासगी विमान कंपन्यांकडून होणारी भाड्याची लूट थांबवण्यासाठी ‘डीजीसीए’ने भाडे नियंत्रण लागू केले आहे. ५०० किमीपर्यंतच्या तिकिटांची किंमत जास्तीत जास्त ७,५०० रुपये आणि १,००० ते १,५०० किमीपर्यंतच्या अंतरासाठी तिकीटांची किंमत १५,००० रुपये असू शकते.

'सबबी नको, काम करा'; HC ने राज्य सरकारला सुनावले - 'पुरातत्व विभाग सरकारचाच भाग, परवानग्या कशा मिळवायच्या ते तुम्हीच पाहा'

Mumbai : गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही; मृताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

उल्हासनगरातील शेकडो मतदारांचा पत्ता जंगलात; मतदार यादीतील गोंधळामुळे मनसे आक्रमक

मुंबईकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी अंधेरी, BKC, धारावीसारख्या महत्त्वाच्या भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद; जपून पाणी वापरा - BMC

आंबा, काजू, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती