राष्ट्रीय

लोकसभेचं बिगुल वाजलं: देशात 7 आणि महाराष्ट्रात 5 टप्प्यांत मतदान, 4 जूनला निकाल; आचारसंहिताही झाली लागू

अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

Swapnil S

निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (शनिवार) दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यासोबतच आचारसंहिताही लागू झाली आहे. 2019 प्रमाणेच यंदाही देशभरात सात टप्प्यांत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल, तर 1 जून रोजी अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान होईल. 4 जून रोजी मतगणना होईल आणि निकाल लागेल. लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. याशिवाय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

लोकसभेसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान

पहिला टप्पा - 19 एप्रिल

दुसरा टप्पा - 26 एप्रिल

तिसरा टप्पा - 7 मे

चौथा टप्पा - 13 मे

पाचवा टप्पा - 20 मे

सहावा टप्पा - 25 मे

सातवा टप्पा - 1 जून

मतगणना - 4 जून

महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान

  • पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी नागपूर, चंद्रपूर, रामटेक गडचिरोली, भंडारा-गोंदिया येथे मतदान होईल.

  • दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड येथे मतदान पार पडेल.

  • तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी बारामती, उस्मानाबाद, रायगड, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली येथे मतदान होईल.

  • चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी शिर्डी, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, मावळ, पुणे, शिरुर, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना येथे मतदान.

  • पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी नाशिक, धुळे, दिंडोरी, भिवंडी, कल्याण, पालघर, ठाणे, मुंबई येथे मतदान.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल