PTI Photo, Screenshot Via Sansad TV
राष्ट्रीय

लोकसभा निवडणूक निकालाने देशातील जातीय राजकारणाचा अंत - अखिलेश

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीने देशातील जातीय राजकारणाचा अंत झाला असून इंडिया आघाडीचा नैतिक विजय झाला आहे, असे सपाचे नेते अखिलेश यादव यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभा २०२४ च्या निवडणुकीने देशातील जातीय राजकारणाचा अंत झाला असून इंडिया आघाडीचा नैतिक विजय झाला आहे, असे सपाचे नेते अखिलेश यादव यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर केलेल्या भाषणात ते म्हणाले की, ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, तो भारतासाठी जातीय राजकारणापासूनच्या स्वातंत्र्याचा दिवस होता. अयोध्येत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला ते मतदारांचे शहाणपण होते. इंडिया आघाडी ही भारत समर्थक असल्याचे संपूर्ण देशाला कळले, ही निवडणूक इंडिया आघाडीचा नैतिक विजय आहे, सकारात्मक राजकारणाचा हा विजय आहे, असेही ते म्हणाले.

...तरीही ईव्हीएमवर विश्वास ठेवणार नाही - अखिलेश

दरम्यान, उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व म्हणजे ८० जागा सपाने जिंकल्या तरी आपण ईव्हीएमवर विश्वास ठेवणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास ईव्हीएम रद्द केले जाईल, आपला ईव्हीएमवर विश्वास नव्हता, आजही नाही, सपाने ८० जागा जिंकल्या तरीही आपण ईव्हीएमवर विश्वास ठेवणार नाही, असे ते म्हणाले.

KDMC रुग्णालयात शिवसेना नगरसेवकाची महिला डॉक्टरला मारहाण; घटना CCTV मध्ये कैद

Mumbai : रिव्हर्स घेताना बेस्ट बसची पादचाऱ्याला धडक; नियंत्रण सुटल्याने पार्क केलेल्या ३ वाहनांचे नुकसान, Video

भारतातील ऑटो कंपोनंट उद्योग १० टक्के वेगाने वाढणार; देशांतर्गत मागणी, वाढत्या निर्यातीमुळे चालू आर्थिक वर्षात क्षेत्र वाढण्याची उद्योगाला अपेक्षा

Mumbai-Pune Railway : अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दिलासा; मुंबई-पुणे मार्गावर काही रेल्वेगाड्या पुन्हा धावल्या

५०० रुपयांऐवजी घेतले ५० युरो! आग्र्यात फ्रेंच पर्यटकांची टॅक्सीचालकाकडून फसवणूक, पोलिसांनी पैसे परत मिळवून दिले, Video