राष्ट्रीय

चार सरकारी विमा कंपन्यांना पाच वर्षांत कोटींचा तोटा

वृत्तसंस्था

सर्व चार सरकारी सर्वसाधारण विमा कंपन्यांना गेल्या पाच वर्षांत आरोग्य विमा विभागात २६,३६४ कोटींचा तोटा झाला आहे. ग्रुप पॉलिसीमध्ये मोठ्या प्रमाणावर जादा दावे दाखल झाल्याने मोठ्या प्रमाणावर तोटा झाल्याचे ‘कॅग’च्या अहवालात म्हटले आहे.

सरकारी सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या आरोग्य विमा व्यवसायात मोठी घट झाली किंवा दावे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सरासरी तोट्यात मोठी वाढ झाल्याचे ‘कॅग’ने संसदेत सादर केलेल्या अहवालात नमूद केले आह.

न्यू इंडिया ॲश्यूरन्स कंपनी लि. (एनआयएसीएल), युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. (यूआयआयसीएल), आोरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (ओआयसीएल) आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. (एनआयसीएल) या सरकारी सर्वसाधारण विमा कंपन्यांचा एकूण तोटा २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीत तब्बल २६,३६४ कोटी रुपयो झाला.

आरोग्य विमा व्यवसायात सरकारी विमा कंपन्यांचा व्यवसाय हा दुसऱ्या क्रमांकाचा (पहिल्या क्रमांवर मोटार विमा व्यवसाय) असून ढोबळ थेट प्रिमियम १,१६,५५१ कोटी रुपये पाच वर्षांत २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीत जमा झाला हाता. सरकारी सर्वसाधारण विमा कंपन्यांचा आरोग्य विमा व्यवसाय सतत कमी होत असून खासगी विमा कंपन्यांचा व्यवसाय वाढत आहे, असेही निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

कॉम्पट्रोलर ॲण्ड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (कॅग)ने अहवालात म्हटले आहे की, अर्थ मंत्रालयाने सप्टेंबर २०१२ /मे २०१३ मध्ये मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत. त्यात ग्रुप पॉलिसीज आणि व्यक्तिगत पॉलिसीज यांचे एकत्रित प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे आणि क्रॉस सबसिडीजसह ग्रुप पॉलिसीजचे प्रमाण १०० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम