'मेटा'ची माफी, तांत्रिक चूक असल्याचा केला खुलासा; फेसबुकने हटवली मोदींची पोस्ट, केंद्र सरकार भडकले 
राष्ट्रीय

'मेटा'ची माफी, तांत्रिक चूक असल्याचा केला खुलासा; फेसबुकने हटवली मोदींची पोस्ट, केंद्र सरकार भडकले

पेपर फुटीविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांशी संवाद साधणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

Swapnil S

नवी दिल्ली : पेपर फुटीविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांशी संवाद साधणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, हा व्हिडीओ फेसबुकवरून हटवण्यात आल्याने केंद्र सरकारने तीव्र आक्षेप नोंदवत मेटा कंपनीला समन्स बजावले आहे. मेटा कंपनीने याप्रकरणी माफी मागितली असली तरी, केंद्र सरकारने दिलेले स्पष्टीकरण अमान्य करत हे प्रकरण अजून 'संपलेले नाही' असा इशारा दिला आहे.

मेटाने सरकारला दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, ऑटोमेटेड कंटेंट फिल्टरमधील तांत्रिक चुकीमुळे ही पोस्ट हटवली गेली होती. ही चूक लक्षात आल्यावर सदर व्हिडीओ पुन्हा रिस्टोअर करण्यात आला आहे. कंपनीने या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

राजकीय पक्षपाताचा आरोप २३ जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर एक सेल्फी व्हिडीओ शेअर केला होता, जो नंतर फेसबुकवरही पोस्ट करण्यात आला. यामध्ये त्यांनी पेपर फुटीवर कडक कायदे आणण्याचे आश्वासन दिले होते.

प्रकरण संपलेले नाही

सरकारी सूत्रांनुसार, मेटाने दिलेले स्पष्टीकरण तर्कसंगत नाही. जर त्यांच्या ऑटोमेटेड सिस्टीममुळे ही चूक झाली असेल, तर त्यांनी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करणे गरजेचे आहे. याप्रकरणी सखोल चर्चेची गरज असून, हे प्रकरण इथेच संपत नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयटी मंत्रालयाने मेटाच्या ग्लोबल हेड ऑफ पब्लिक पॉलिसी यांना समन्स जारी केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : सत्ताधारी-विरोधकांच्या सेवेत महागड्या गाड्या; सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्यांना मिळणार नव्या कोऱ्या इनोव्हा

Mumbai : आक्षेपानंतरही सेव्हन हिल्सचा प्रस्ताव मंजूर; सुधार समितीत खासगीकरणाला विरोधकांचा विरोध

नवी मुंबईतील १२,६८७ अनधिकृत बांधकामांवर हातोडा; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेचे पाऊल, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Mumbai : शीव उड्डाणपुलाची एक मार्गिका ३१ ऑगस्टपर्यंत सुरू होणार? धारावी बचाव आंदोलनाच्या शिष्टमंडळाला रेल्वे अधिकाऱ्यांचे आश्वासन

मुंबई रेल्वे महामंडळाच्या भांडवलात वाढ; समभाग भांडवल ५०० कोटींपर्यंत वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय