राष्ट्रीय

मिझोराम, आसाम सीमा विवाद सोडवण्यासाठी सहमती

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वास सरमा यांनी शुक्रवारी सकाळी गुवाहाटीमध्ये असलेले मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांना जेवणासाठी आमंत्रित केले

Swapnil S

ऐजवाल : मिझोराम आणि आसाम यांनी शुक्रवारी प्रलंबित असलेल्या आंतरराज्य सीमा विवादाचे निराकरण करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे मान्य केले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वास सरमा यांनी शुक्रवारी सकाळी गुवाहाटीमध्ये असलेले मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांना जेवणासाठी आमंत्रित केले आणि दोन्ही नेत्यांनी सीमा प्रश्नावर चर्चा केली. बैठकीदरम्यान लालदुहोमा आणि सरमा यांनी दोन ईशान्येकडील राज्यांमधील सीमा विवाद सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे मान्य केले, असे त्यात म्हटले आहे. जोपर्यंत दोन्ही शेजारी राज्ये सीमेवर चर्चा करत आहेत तोपर्यंत सीमेवर शांतता राखण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली, असेही त्यात म्हटले आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव