राष्ट्रीय

मिझोराम, आसाम सीमा विवाद सोडवण्यासाठी सहमती

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वास सरमा यांनी शुक्रवारी सकाळी गुवाहाटीमध्ये असलेले मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांना जेवणासाठी आमंत्रित केले

Swapnil S

ऐजवाल : मिझोराम आणि आसाम यांनी शुक्रवारी प्रलंबित असलेल्या आंतरराज्य सीमा विवादाचे निराकरण करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे मान्य केले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वास सरमा यांनी शुक्रवारी सकाळी गुवाहाटीमध्ये असलेले मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांना जेवणासाठी आमंत्रित केले आणि दोन्ही नेत्यांनी सीमा प्रश्नावर चर्चा केली. बैठकीदरम्यान लालदुहोमा आणि सरमा यांनी दोन ईशान्येकडील राज्यांमधील सीमा विवाद सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे मान्य केले, असे त्यात म्हटले आहे. जोपर्यंत दोन्ही शेजारी राज्ये सीमेवर चर्चा करत आहेत तोपर्यंत सीमेवर शांतता राखण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली, असेही त्यात म्हटले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली