राष्ट्रीय

मिझोराम, आसाम सीमा विवाद सोडवण्यासाठी सहमती

Swapnil S

ऐजवाल : मिझोराम आणि आसाम यांनी शुक्रवारी प्रलंबित असलेल्या आंतरराज्य सीमा विवादाचे निराकरण करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे मान्य केले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वास सरमा यांनी शुक्रवारी सकाळी गुवाहाटीमध्ये असलेले मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांना जेवणासाठी आमंत्रित केले आणि दोन्ही नेत्यांनी सीमा प्रश्नावर चर्चा केली. बैठकीदरम्यान लालदुहोमा आणि सरमा यांनी दोन ईशान्येकडील राज्यांमधील सीमा विवाद सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे मान्य केले, असे त्यात म्हटले आहे. जोपर्यंत दोन्ही शेजारी राज्ये सीमेवर चर्चा करत आहेत तोपर्यंत सीमेवर शांतता राखण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली, असेही त्यात म्हटले आहे.

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

कार देणार बाईकएवढं मायलेज! 'ही' CNG कार लवकरच होतीये लॉन्च, किती असेल किंमत?

LICची 'एक नंबर' स्कीम; छोटी रक्कम गुंतवून मिळेल लाखोंचा फायदा

काय सांगता? एप्रिलमध्ये तब्बल ३ लाख लोकांनी खरेदी केली 'ही' बाईक, पाहा लिस्ट