राष्ट्रीय

मिझोराम, आसाम सीमा विवाद सोडवण्यासाठी सहमती

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वास सरमा यांनी शुक्रवारी सकाळी गुवाहाटीमध्ये असलेले मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांना जेवणासाठी आमंत्रित केले

Swapnil S

ऐजवाल : मिझोराम आणि आसाम यांनी शुक्रवारी प्रलंबित असलेल्या आंतरराज्य सीमा विवादाचे निराकरण करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे मान्य केले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वास सरमा यांनी शुक्रवारी सकाळी गुवाहाटीमध्ये असलेले मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांना जेवणासाठी आमंत्रित केले आणि दोन्ही नेत्यांनी सीमा प्रश्नावर चर्चा केली. बैठकीदरम्यान लालदुहोमा आणि सरमा यांनी दोन ईशान्येकडील राज्यांमधील सीमा विवाद सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे मान्य केले, असे त्यात म्हटले आहे. जोपर्यंत दोन्ही शेजारी राज्ये सीमेवर चर्चा करत आहेत तोपर्यंत सीमेवर शांतता राखण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली, असेही त्यात म्हटले आहे.

Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच

कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढणार; इथेनॉल उद्योग २० टक्के मिश्रण पुरवण्यास सज्ज

दक्षिण मुंबईतील शौचालय प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात; महापालिका अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी भारत मार्गदर्शक बनणार; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

मुंबईला पुराचा धोका वाढला! १३० नवीन फ्लडिंग पॉइंट; ५६१ ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका