राष्ट्रीय

मिझोराम, आसाम सीमा विवाद सोडवण्यासाठी सहमती

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वास सरमा यांनी शुक्रवारी सकाळी गुवाहाटीमध्ये असलेले मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांना जेवणासाठी आमंत्रित केले

Swapnil S

ऐजवाल : मिझोराम आणि आसाम यांनी शुक्रवारी प्रलंबित असलेल्या आंतरराज्य सीमा विवादाचे निराकरण करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे मान्य केले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वास सरमा यांनी शुक्रवारी सकाळी गुवाहाटीमध्ये असलेले मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांना जेवणासाठी आमंत्रित केले आणि दोन्ही नेत्यांनी सीमा प्रश्नावर चर्चा केली. बैठकीदरम्यान लालदुहोमा आणि सरमा यांनी दोन ईशान्येकडील राज्यांमधील सीमा विवाद सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे मान्य केले, असे त्यात म्हटले आहे. जोपर्यंत दोन्ही शेजारी राज्ये सीमेवर चर्चा करत आहेत तोपर्यंत सीमेवर शांतता राखण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली, असेही त्यात म्हटले आहे.

विरोधक म्हणजे 'नाराज फुफा'; प्रगती झाली तरी तक्रारी चालूच, मोदींचा हल्लाबोल; डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे उद्घाटन

Maratha Reservation : सरकारकडून निव्वळ फसवणूक - मनोज जरांगे; उपोषणाचा ११ वा दिवस, सलाईन घेतले

Maratha Reservation : चर्चेची दारे बंद- राधाकृष्ण विखे-पाटील यांचे संकेत

PM Modi's Mumbai Event: कार्यक्रमस्थळी बनावट PMO अधिकारी; बॉडीगार्ड आणि बंदुकीसह ताब्यात, सुरक्षेतील मोठी त्रुटी उघड

मोहम्मद अली रोड अतिक्रमणमुक्त; फुटपाथवरील बेकायदा स्टॉल्स, दुकाने, बांधकामांवर हातोडा; BMC च्या 'बी' वॉर्डात धडक कारवाई