एक्स @narendramodi
राष्ट्रीय

आजचा कार्यक्रम अनेकांची झोप उडवेल - मोदी

विझिंजम बंदराच्या उद्घाटनप्रसंगी मोदींसोबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि काँग्रेस खासदार शशी थरूर हे व्यासपीठावर एकत्र आले होते.

Swapnil S

तिरुवनंतपुरम : विझिंजम बंदराच्या उद्घाटनप्रसंगी मोदींसोबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि काँग्रेस खासदार शशी थरूर हे व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी मोदी यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता वाढली आहे. मोदी म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की,ते इंडिया आघाडीचे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. शशी थरूरही बसले आहेत, आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल. जिथे संदेश जायचा होता तिथे गेला आहे. मोदींच्या या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अस्वस्थता वाढली

काँग्रेस खासदार शशी थरूर हे काँग्रेसचे तिरुवनंतपुरम लोकसभेचे खासदार आहेत. जे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्सचे (इंडिया) एक प्रमुख सदस्य आहे. मोदींनी हे वक्तव्य जरी विनोदाने केले असले, तरी राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ करण्याच्या उद्देशाने ते होते असे दिसून आले.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली