एक्स @narendramodi
राष्ट्रीय

आजचा कार्यक्रम अनेकांची झोप उडवेल - मोदी

विझिंजम बंदराच्या उद्घाटनप्रसंगी मोदींसोबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि काँग्रेस खासदार शशी थरूर हे व्यासपीठावर एकत्र आले होते.

Swapnil S

तिरुवनंतपुरम : विझिंजम बंदराच्या उद्घाटनप्रसंगी मोदींसोबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि काँग्रेस खासदार शशी थरूर हे व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी मोदी यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता वाढली आहे. मोदी म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की,ते इंडिया आघाडीचे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. शशी थरूरही बसले आहेत, आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल. जिथे संदेश जायचा होता तिथे गेला आहे. मोदींच्या या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अस्वस्थता वाढली

काँग्रेस खासदार शशी थरूर हे काँग्रेसचे तिरुवनंतपुरम लोकसभेचे खासदार आहेत. जे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्सचे (इंडिया) एक प्रमुख सदस्य आहे. मोदींनी हे वक्तव्य जरी विनोदाने केले असले, तरी राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ करण्याच्या उद्देशाने ते होते असे दिसून आले.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास