राष्ट्रीय

दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

कानपूरची घटना; प्रेमावरून वाद झाल्याचा संशय

नवशक्ती Web Desk

कानपूर : मुलीच्या वादातून एका विद्यार्थ्याने प्रयाग विद्यामंदिर इंटर कॉलेजमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याने दुसऱ्या अल्पवयीन मुलाची वर्गात चाकू भोसकून हत्या केली आहे. एका मुलीवरून दोघांमध्ये शनिवारी भांडण झाले होते. त्यावरून ही हत्या झाली असावी, असा संशय आहे.

मृत नीलेंद्र तिवारी हा १५ वर्षांचा, तर आरोपी १३ वर्षांचा आहे. शनिवारी दोघांमध्ये वाद झाला होता. पण, मित्रांनी त्याचे भांडण सोडवले होते. मात्र, सोमवारी वर्गात पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. आरोपी व नीलेंद्र यांची चांगली मैत्री होती. पण, त्यांच्यासोबत शिकणाऱ्या मुलीशी नीलेंद्र गप्पा मारू लागला. आरोपीला ही बाब आवडली नाही. तो नीलेंद्रवर नाराज होता.

सोमवारी आरोपीने बॅगमध्ये चाकू ठेवला होता. त्याने नीलेंद्रच्या पोटात व गळ्यावर अनेक वार केले. यानंतर तातडीने नीलेंद्रला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी शाळेत जाऊन आरोपी विद्यार्थ्याची चौकशी केली. नीलेंद्रने आरोपीला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आरोपी घाबरला होता. त्यानंतर आरोपीने नीलेंद्रच्या हत्येचा कट आखला. घरातून त्याने चाकू घेऊन तो शाळेत गेला. जेवणाच्या सुट्टीत त्याने नीलेंद्रला धक्का मारून जमिनीवर पाडले. तेथे त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

१ एप्रिलपासून वीजदर घटणार; २०३० पर्यंत ग्राहकांना टप्प्याटप्प्याने दिलासा

राज्यभरातील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय; २०११ पर्यंतच्या अतिक्रमणांना फायदा

एक लाख फेरीवाल्यांचे होणार पुनर्वसन; फेरीवाला समिती निवडणुकीचा निकाल आज

नवी मुंबईतून आता थेट श्रीनगर, गोवा, तिरुपती; उद्यापासून विमानसेवांचा विस्तार, तब्बल ४६ शहरांसाठी थेट सेवा

विमान भाडे झाले दुप्पट; हापूसच्या निर्यातीतही गळ होण्याचा धोका