राष्ट्रीय

देशाचा निर्धार, मोदीच पंतप्रधान: शहा

Swapnil S

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनाच तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्याचा निर्धार देशवासीयांनी केला आहे. देशात सध्या महाभारतातील युद्धासारखी परिस्थिती आहे. कौरव आणि पांडवांप्रमाणेच आजही दोन पक्ष आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच देशाचे हित साधण्यास सक्षम आहे. विरोधी इंडिया आघाडी म्हणजे घराणेशाही पोसणाऱ्या सात राजकीय पक्षांचा गट आहे. त्यांचा भर भ्रष्टाचार आणि नाकर्तेपणावर असल्याचे टीकास्त्र सोडत गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसने राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण अव्हेरले. नागरिक सुधारणा कायदा आणण्यास आणि जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यास विरोध केला. काँग्रेस केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे, असा आरोपही शहा यांनी केला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस