राष्ट्रीय

एनआयएची सहा राज्यांतील १३ ठिकाणी छापेमारी; कागदपत्रे, संशयास्पद साहित्य केले जप्त

महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण १३ ठिकाणांवर ‘एनआयए’ने ही कारवाई केली

वृत्तसंस्था

‘एनआयए’ने रविवारी देशातील सहा राज्यांतील १३ ठिकाणी संशयितांचे घर, तसेच इतर परिसरावर छापे टाकण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यात ‘एनआयए’ने ही कारवाई केली आहे. ‘एनआयए’ने मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन जिल्हा, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद, बिहारमधील अररिया, कर्नाटक राज्यातील भटकळ आणि तुमकूर, उत्तर प्रदेशातील देवबंद तर महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण १३ ठिकाणांवर ‘एनआयए’ने ही कारवाई केली आहे.

कागदपत्रे, संशयास्पद साहित्य जप्त

‘एनआयए’ने यूएपीए कायद्याच्या १८, १८ बी, ३८,३९ आणि ४० तसेच भारतीय दंड संहितेच्या करलन १५३ ए आणि १५३ बी कलमांतर्गत २५ जून २०२२ रोजी दहशतवादी संघटना ‘इसिस’शी संबंधित एका गुन्ह्याची नोंद केली होती. याच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ‘एनआयए’ने ही कारवाई केली आहे. या कारवाईत संशयित १३ ठिकाणांवरून कागदपत्रे, तसेच संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्रात नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यात ‘एनआयए’ने छापेमारी केली आहे. कोल्हापूरमधील हुपरी येथून ‘एनआयए’ने इर्शाद शौकत शेख आणि अल्ताफ शेख या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, पहाटे ४ वाजता ही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा