Photo - @detresfa_ on X
राष्ट्रीय

Operation Sindoor : पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा उघड; भारताच्या आदमपूर एअरबेसवर हल्ल्याचा दावा खोटा असल्याचा खुलासा

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. याच दरम्यान, पाकिस्तानने एक उपग्रहाचे छायाचित्र शेअर करुन पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा केला. हा दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे.

Swapnil S

इस्लामाबाद : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. याच दरम्यान, पाकिस्तानने एक उपग्रहाचे छायाचित्र शेअर करुन पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा केला. हा दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे.

पाकिस्तानने खोटेपणा पसरवण्यास आणि भारतीय हवाई तळ आणि प्रतिष्ठानांवर हल्ला करण्याच्या बनावट गोष्टी रचण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानकडे दाखवण्यासाठी कोणतेही पुरावे नसल्याने, ते आता छेडछाड केलेल्या सॅटेलाईट फोटो आणि चुकीच्या माहितीचा वापर करत आहे. गेल्या महिन्यात, फोटो विश्लेषक डेमियन सायमन यांनी पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या गोष्टींचा पर्दाफाश केला. 'पाकिस्तानने चीनच्या उपग्रह कंपनीने दिलेल्या फोटोंमध्ये कसे फेरफार करून खोटे फोटो तयार केल्या आहेत', हे स्पष्ट केले.

पाकिस्तानने भारताच्या आदमपूर हवाई तळावर सुखोई-३०एमकेआयवर हल्ला करून त्याचे नुकसान केल्याचा दावा केला होता. या दाव्याच्या समर्थनार्थ वापरल्या गेलेल्या उपग्रह फोटोंमध्ये जळालेल्या जागेजवळ एक जेट विमान दिसत होते. तपासणीनंतर आढळून आले की, हा फोटो संघर्षापूर्वीचा आहे आणि प्रत्यक्षात नियमित देखभालीखाली असलेले मिग-२९ विमान दाखवले आहे. इंजिनच्या वारंवार चाचणीमुळे काजळी साचल्याने झालेले नुकसान हे कथित नुकसान होते.

शासकीय जमिनीवरील पात्र घरांना कायदेशीर मान्यता; २०११ पूर्वीच्या पात्र घरांसाठी सुवर्णसंधी; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार

Thane : सिग्नलवरील प्रतीक्षा अवधी १५ सेकंदांवर येणार; वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट