भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत पीव्ही सिंधूने मिशेल लीवर २१-१५, २१-१३ असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे 19 वे सुवर्णपदक आहे. त्यामुळे भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 56 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 15 रौप्य आणि 22 कांस्य पदकांचा समावेश आहे.