प्रातिनिधिक छायाचित्र  
राष्ट्रीय

मोदींकडे कोणताही नवीन विचार नाही; राहुल गांधी यांची जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणताही नवा विचार उरलेला नाही आणि तरुणांना रोजगाराऐवजी फक्त जुमले मिळणार आहेत, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणताही नवा विचार उरलेला नाही आणि तरुणांना रोजगाराऐवजी फक्त जुमले मिळणार आहेत, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘विकसित भारत योजना’वर शुक्रवारी टीका केली.

पावसाळी अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांनी कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाला विचारलेल्या लेखी प्रश्नाची प्रत आणि त्याचे उत्तर शेअर केले. ‘एक्स’वर पोस्ट करताना राहुल गांधी म्हणाले, "एक लाख कोटी रुपयांचा जुमला – सीझन २. ११ वर्षांनंतरही मोदीजींचे तेच जुने जुमले, तेच रटलेले आकडे."

गांधी म्हणाले, गेल्या वर्षी एक लाख कोटी रुपयांतून एक कोटी इंटर्नशिपचे आश्वासन देण्यात आले होते. यंदाही एक लाख कोटी रुपयांच्या रोजगार योजनेचे आश्वासन देण्यात आले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले, "सत्य काय? संसदेत माझ्या प्रश्नाला सरकारने मान्य केले की १० हजारांपेक्षा कमी इंटर्नशिप झाल्या. मेहनताना इतका कमी होता की ९० टक्के तरुणांनी नकार दिला." त्यांनी आरोप केला, "मोदीजींकडे आता कोणताही नवी संकल्पना नाही. या सरकारकडून तरुणांना रोजगार नाही, फक्त जुमले मिळतील, असे ते म्हणाले.

"आता कोण गप्प आहे?" रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीनंतर विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबईतील हॉटेल्स, बार, बेकऱ्या FDA च्या रडारवर; ख्रिसमस-नववर्षाच्या तोंडावर तपासणी मोहीम

मुंबईच्या हवा गुणवत्तेसाठी 'मानस'ची निर्मिती; IIT Kanpur च्या सहकार्याने BMC राबवणार प्रकल्प

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

Thane RTO : वाहनधारकांनो तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली? 'डेडलाईन' जारी; त्वरित ऑनलाइन अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन