राष्ट्रीय

भर पावसात राहुल गांधींनी केले भाषण

भारत जोडो यात्रेचे लक्ष्य भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे भारतात पसरवल्या जाणाऱ्या विद्वेषाच्या विरोधात उभे राहणे हा आहे.

वृत्तसंस्था

तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात भाषण केले होते. त्यानंतर निवडणुकीचे पारडे बदलले. म्हैसूरला रविवारी रात्री धो धो पाऊस कोसळत होता. त्या पावसात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हजारो लोकांमध्ये भाषण केले.

गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेचे लक्ष्य भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे भारतात पसरवल्या जाणाऱ्या विद्वेषाच्या विरोधात उभे राहणे हा आहे. ही यात्रा कन्याकुमार ते काश्मीरपर्यंत चालेल. कोणत्याही परिस्थितीत ती थांबणार नाही. आजचा पाऊसही आम्हाला थांबवू शकला नाही. नदीसारखी ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरला जाईल. कडक ऊन, पाऊस किंवा थंडीतही ही यात्रा थांबणार नाही. ही नदीरूपी यात्रेत तुम्हाला विद्वेष किंवा हिंसा दिसणार नाही. तुम्हाला प्रेम दिसेल. कर्नाटकातील भाजप सरकार काय करते आहे, हे तुम्हाला सर्वांना दिसत आहे. भाजप व त्यांच्या मुख्यमंत्र्याने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम तोडले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण