राष्ट्रीय

भर पावसात राहुल गांधींनी केले भाषण

भारत जोडो यात्रेचे लक्ष्य भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे भारतात पसरवल्या जाणाऱ्या विद्वेषाच्या विरोधात उभे राहणे हा आहे.

वृत्तसंस्था

तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात भाषण केले होते. त्यानंतर निवडणुकीचे पारडे बदलले. म्हैसूरला रविवारी रात्री धो धो पाऊस कोसळत होता. त्या पावसात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हजारो लोकांमध्ये भाषण केले.

गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेचे लक्ष्य भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे भारतात पसरवल्या जाणाऱ्या विद्वेषाच्या विरोधात उभे राहणे हा आहे. ही यात्रा कन्याकुमार ते काश्मीरपर्यंत चालेल. कोणत्याही परिस्थितीत ती थांबणार नाही. आजचा पाऊसही आम्हाला थांबवू शकला नाही. नदीसारखी ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरला जाईल. कडक ऊन, पाऊस किंवा थंडीतही ही यात्रा थांबणार नाही. ही नदीरूपी यात्रेत तुम्हाला विद्वेष किंवा हिंसा दिसणार नाही. तुम्हाला प्रेम दिसेल. कर्नाटकातील भाजप सरकार काय करते आहे, हे तुम्हाला सर्वांना दिसत आहे. भाजप व त्यांच्या मुख्यमंत्र्याने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम तोडले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मध्यरात्रीचा ब्लॉक; हार्बर मार्गावर रविवारी दिवसाचा मेगाब्लॉक

Mumbai : एअर इंडिया इमारतीला मिळणार नवी झळाळी; नूतनीकरणासाठी १८१ कोटी मंजूर

अविश्वास ठरावासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यकच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाला दिलासा

कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणींत वाढ; 'विनोदाच्या नादात विकृती केल्यास थेट कारवाई', गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा

Mumbai : ब्रेक, स्टेअरिंग नीट हाताळा! दुचाकीस्वारांना क्रॉस करू नका! सुमारे ७ हजारांहून अधिक चालकांचे 'बेस्ट काऊन्सलिंग'