राहुल गांधी  संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

‘जीएसटी’ हे आर्थिक अन्यायाचे हत्यार - राहुल गांधी

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हे आर्थिक अन्यायाचे हत्यार बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही अब्जाधीश मित्रांना फायदा व्हावा, यासाठीच ‘जीएसटी’ची रचना करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीला मंगळवारी आठ वर्षे पूर्ण झाली. राहुल गांधी यांनी यानिमित्ताने सरकारवर टीका केली.

Swapnil S

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हे आर्थिक अन्यायाचे हत्यार बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही अब्जाधीश मित्रांना फायदा व्हावा, यासाठीच ‘जीएसटी’ची रचना करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीला मंगळवारी आठ वर्षे पूर्ण झाली. राहुल गांधी यांनी यानिमित्ताने सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, “८ वर्षांनंतरही मोदी सरकारने ‘जीएसटी’मध्ये कोणतीही सुधारणा केलेली नाही. हे आर्थिक अन्याय आणि कॉर्पोरेट मित्रत्वाचे एक क्रूर हत्यार आहे. गरीबांना शिक्षा करण्यासाठी, लघु-सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) चिरडण्यासाठी, राज्यांना कमकुवत करण्यासाठी आणि पंतप्रधानांच्या काही अब्जाधीश मित्रांना फायदा देण्यासाठी ‘जीएसटी’ची रचना करण्यात आली होती.”

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा