राष्ट्रीय

...तोपर्यंत भारत-चीन संबंध सुरळीत नाहीत; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ठणकावले

प्रतिनिधी

सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय भारत-चीन संबंध सुरळीत होणार नाहीत, असे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनी संरक्षणमंत्र्यांना गुरुवारी ठणकावले.

चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांनी राजनाथ सिंह यांच्यासमोर सीमा वादाचा मुद्दा उपस्थित केला. विद्यमान करारांचे उल्लंघन होत असल्याने द्विपक्षीय संबंधांच्या मूलभूत तत्वांना धक्का बसत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंबंधातील सर्व मुद्यांना द्विपक्षीय करारानुसार सोडवणे गरजेचे आहे.

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी शांगफू हे दिल्लीत आले आहेत. भारत हा एससीओच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करत आहेत. तीन वर्षांपूर्वीच्या लडाख सीमा वादानंतर चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच भारतीय दौरा आहे. या दोन्ही संरक्षणमंत्र्यांच्या चर्चेनंतर अजून कोणतेही अधिकृत निवेदन जाहीर झालेले नाही.

'भिडू' बोलून 'जग्गूदादा'ची नक्कल महागात पडणार! जॅकी श्रॉफची हायकोर्टात धाव; खटला केला दाखल

भीमा-कोरेगाव प्रकरण: गौतम नवलखा यांना मोठा दिलासा; SC ने दिला जामीन; उच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती वाढवण्यास नकार

PM Modi: उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी का गेले कालभैरव मंदिरात?

उमेदवारच स्वत:च्या मतदानाला मुकले; उमेदवारी एका मतदारसंघात, मतदान दुसऱ्या मतदारसंघात

वादळी पावसाचा २२ केव्हीला फटका; मुंबईत 'या' ठिकाणी पाणीपुरवठा बंद