राष्ट्रीय

सर्वोदय सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध; १५ हजार रुपये काढण्याची मर्यादा

Swapnil S

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सोमवारी मुंबईस्थित सर्वोदय सहकारी बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. १५ एप्रिल २०२४ पासून सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू राहतील. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक अशा निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल, असे आरबीआयने सांगितले. बँकेची ढासळती आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी १५ हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. या अंतर्गत, पात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम केवळ ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) कडून मिळण्यास पात्र असेल.

सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेवरील बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ ए अंतर्गत निर्बंध घातले आहेत. आता, सर्वोदय सहकारी बँक रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही कर्ज आणि ॲडव्हान्स देऊ किंवा घेऊ शकणार नाही. तसेच बँक कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही किंवा त्यांचे नूतनीकरणही करू शकणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे.

मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, विशेषत: सर्व बचत बँक किंवा चालू खात्यातील किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातून १५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?

मुंबईत केजरीवाल Vs मोदी आमनेसामने ; शिवाजी पार्कात महायुती तर BKC मध्ये महाविकास आघाडीची सभा

मंत्री छगन भुजबळ महायुतीवर नाराज? गिरीश महाजन भेटीला, राजकीय चर्चेला उधाण