राष्ट्रीय

‘बीएलओं’ना सर्वोच्च दिलासा! कामाचा जास्त भार असल्यास आणखी कर्मचारी तैनात करणे ही राज्य सरकारची जबाबदारी - SC

राज्य सरकारने अथवा राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाची (एसआयआर) कर्तव्ये पार पाडावीच लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : राज्य सरकारने अथवा राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाची (एसआयआर) कर्तव्ये पार पाडावीच लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच, बीएलओंवर कामाचा जास्त भार असल्यास आणखी कर्मचारी तैनात करणे ही राज्य सरकारची जबाबदारी असेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टात गुरुवारी पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये एसआयआरला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले की, राज्य सरकारांनी किंवा राज्य निवडणूक आयोगांनी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना एसआयआरची कर्तव्ये पार पाडावी लागतील.

वैधानिक कामांना बांधील

सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सांगितले की, राज्य सरकारी कर्मचारी एसआयआरसह इतर वैधानिक कामे करण्यास बांधील आहेत. राज्य सरकारांचेही कर्तव्य आहे की, त्यांनी निवडणूक आयोगाला कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत.

पीएम मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची युक्रेन संघर्षावर महत्त्वाची भूमिका; म्हणाले, 'भारत-रशिया मैत्री अढळ'

महायुती सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा रिपोर्ट कार्ड, बावनकुळे म्हणाले, "महाराष्ट्र आता...

IndiGo एअरलाइन्सचा माफीनामा; प्रवाशांसाठी हॉटेल-रिफंड सुविधा, “आम्ही लवकरच....

Mahaparinirvan Din 2025 : जीवनाला कलाटणी देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार, 'जो समाज शिक्षणापासून...

राज्यातील निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरलाच; मतमोजणीवर 'सर्वोच्च' आदेश