राष्ट्रीय

बिहारमध्ये दारू प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू; प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह जाळले

बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरु असताना अवैध दारू प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Swapnil S

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरु असताना अवैध दारू प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यावर पांघरूण घालण्यासाठी सहाही जणांचे मृतदेह प्रशासनाला न कळविताच जाळून टाकण्यात आले आहेत.

पश्चिम चंपारणच्या बेतियामध्ये ही घटना घडली आहे. या सर्वांनी विषारी दारूचे सेवन केले होते. प्रशासनाने अद्याप दारूमुळे या लोकांना मृत्यू झाल्याचे जाहीर केलेल नाही.

सर्व मृत हे मठिया या एकाच गावातील आहेत. लौरिया पोलिस स्टेशन हद्दीतील मठिया गावात ३५ वर्षीय प्रदीप गुप्ता यांचा गुरुवारी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर शनिवारी काही तासांतच एकामागून एक आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये काका आणि पुतण्यांचाही समावेश आहे. कुटुंबातील सदस्यांनी घाईघाईत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबाने याबद्दल पोलिसांना माहिती दिली नाही. एसडीएम सूर्यप्रकाश गुप्ता यांनी ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दम्यामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा अर्धांगवायूमुळे मृत्यू झाला. थंडीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार : प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला; तस्लीमा नसरीन यांची संतप्त प्रतिक्रिया, "जिहादींनी जेम्सला...

Navi Mumbai : मातृत्वाला काळीमा! कळंबोलीत चिमुकलीचा गळा दाबून खून

मुरबाडमध्ये विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; मुख्याध्यापक निलंबित

ठाणे महापालिका निवडणुकीत शाईऐवजी मार्कर

Mumbai : रेस्टॉरंट, हॉटेल्सवर करडी नजर; नववर्षासाठी FDA सज्ज