राष्ट्रीय

‘भारताचे मंदिर’ पुन्हा बांधण्याचे काम देवाने सोपवले आहे; श्री कल्की धाम मंदिराच्या पायाभरणीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

Swapnil S

संभल : देशासाठी कालचक्र फिरले आहे, कारण त्याने अनेक विक्रम नोंदवले आहेत आणि जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले आणि सांगितले की, देवाने त्यांना ‘भारताचे मंदिर’ पुन्हा बांधण्याचे काम सोपवले आहे. उत्तर प्रदेशातील श्री कल्की धाम मंदिराच्या पायाभरणीनंतर ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या दिवशी त्यांनी सांगितले होते की २२ जानेवारीपासून नवीन चक्र सुरू झाले आहे. जेव्हा प्रभू श्रीराम राज्य करत होते, तेव्हा त्यांचा प्रभाव हजारो वर्षे टिकला होता. त्याचप्रमाणे, रामलल्लाच्या सिंहासनासोबतच पुढील हजार वर्षांचा भारताचा नवीन प्रवास सुरू झाला.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या द्रष्ट्यांचे आणि धार्मिक नेत्यांचे आशीर्वाद घेत पंतप्रधान मोदी म्हणाले, देवाने मला 'राष्ट्रीय रुपी मंदिर' पुन्हा बांधण्याचे काम दिले आहे.

एकीकडे तीर्थक्षेत्रे विकसित होत असताना, दुसरीकडे शहरांना हायटेक पायाभूत सुविधा मिळत आहेत, आज मंदिरे बांधली जात आहेत, तर देशभरात नवीन वैद्यकीय महाविद्यालयेही सुरू होत आहेत. आज आपली प्राचीन शिल्पेही परदेशातून परत आणली जात आहेत आणि विक्रमी विदेशी गुंतवणूकही येत आहे. काळाचे चाक फिरले आहे आणि एक नवीन युग आपले दार ठोठावत आहे याचा हा बदल पुरावा आहे. खुल्या मनाने याचे स्वागत करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादनही मोदी यांनी केले.

पंतप्रधान म्हणाले की, भारत प्रथमच अशा स्थितीत आहे जेथे तो इतरांचे अनुसरण करत नाही तर एक उदाहरण मांडत आहे. प्रथमच तंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताकडे शक्यतांचे केंद्र म्हणून पाहिले जात आहे आणि देशाला नाविन्यपूर्ण केंद्र म्हणून ओळखले गेले आहे. आम्ही पहिल्यांदाच जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि आम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर देखील पोहोचलो आहोत, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी; दशकातील सर्वोच्च पातळीवर निर्देशांक

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीला मिळाला नवीन होस्ट, महेश मांजरेकरांच्या जागी दिसणार 'हा' अभिनेता

नवी मुंबईत मॉरिशसच्या नागरिकाचा खून, छडा लागला; दोन अल्पवयीन मुलींसह एक तरुण पोलिसांच्या ताब्यात

भाडेकरार संपुष्टात आला तर गाशा गुंडाळावाच लागेल, HC चा दणका; घर रिकामे करण्याच्या नोटिसीला स्थगिती देण्यास नकार

बारावीचा निकाल आज; 'डिजीलॉकर'मध्ये गुणपत्रिका संग्रहित देखील करता येणार