‘मणिपूर खटल्यांचे कामकाज वेगाने करा’ - सर्वोच्च न्यायालय 
राष्ट्रीय

‘मणिपूर खटल्यांचे कामकाज वेगाने करा’ - सर्वोच्च न्यायालय

मणिपूरमध्ये २०२३ मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचार प्रकरणांमधील सुरू असलेल्या खटल्यांचे कामकाज जलद गतीने (फास्ट ट्रॅकवर) चालवणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये २०२३ मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचार प्रकरणांमधील सुरू असलेल्या खटल्यांचे कामकाज जलद गतीने (फास्ट ट्रॅकवर) चालवणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. यासोबतच न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा सद्यस्थिती अहवाल मागवला आहे.

मणिपूरमधील डोंगराळ जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मोर्चा' काढल्यानंतर ३ मे २०२५ रोजी राज्यात वांशिक हिंसाचार भडकला होता. मैतेई समुदायाला 'अनुसूचित जमाती' चा दर्जा देण्याच्या मागणीविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. या हिंसाचारात २६० हून अधिक लोकांचा बळी गेला होता, तर हजारो नागरिक विस्थापित झाले होते.

सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने बुधवारी एका विशेष तपास पथकाच्या अहवालाची दखल घेतली. या अहवालानुसार, आतापर्यंत ४०० हून अधिक आरोपींविरुद्ध २०७ प्रकरणांमध्ये आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण