राष्ट्रीय

सर्व आमदार-खासदारांच्या शरीरावर डिजिटल चिप बसवून पाळत, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Swapnil S

नवी दिल्ली : देशातील सर्व आमदार आणि खासदारांवर डिजिटल पद्धतीने नजर ठेवण्यासंबंधी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

देशातील मतदार आमदार आणि खासदारांना निवडून राज्यांच्या विधानसभा आणि देशाच्या संसदेत पाठवतात. त्यांनी जनतेचे प्रतिनिधी आणि सेवक म्हणून काम करणे अपेक्षित असते. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांचे वर्तन बदलते. ते लोकांचे राजे असल्यासारखे वागू लागतात. भ्रष्टाचारात गुंतले जातात. त्यामुळे देशातील सर्व आमदार आणि खासदारांच्या शरीरावर डिजिटल चिप बसवून सतत त्यांच्यावर पाळत ठेवली जावी, अशा आशयाची जनहित याचिका सुरिंदरनाथ कुंद्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. परडीवाला आणि न्या. मनेज मिसरा यांच्या खंडपीठाने म्हटले की, लोकप्रतिनिधी म्हणजे काही दोष सिद्ध झालेले गुन्हेगार नव्हेत. त्यामुळे त्यांच्या अंगावर डिजिटल चिप बसवून हेरगिरी करता येणार नाही. त्यांनाही खासगीपणाचा अधिकार आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस