राष्ट्रीय

...तर शेतकरी हा जीडीपी वाढीचा शिल्पकार; किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी मिळाल्यास जीडीपी वाढीस चालना-राहुल गांधी यांचे मत

Swapnil S

नवी दिल्ली : किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळाल्यास देशातील शेतकरी अर्थसंकल्पावर ओझे ठरणार नसून सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीसाठी ते प्रोत्साहक ठरेल, असे मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केले. अर्थसंकल्प पाहता एमएसपीची कायदेशीर हमी देणे शक्य नसल्याचे खोटे बोलले जात असल्याचेही ते म्हणाले. जे एमएसपीबाबत संभ्रम पसरवत आहेत. ते डॉ. स्वामीनाथन आणि त्यांच्या स्वप्नांचा अपमान करत आहेत. एमएसपीच्या हमीमुळे, भारतीय शेतकरी अर्थसंकल्पावर ओझे होणार नाही, तर शेतकरी हा जीडीपी वाढीचा शिल्पकार बनेल, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

एक्सवरील हिंदीतील एका पोस्टमध्ये राहुल गांधींनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसने किमान आधारभूत किंमत देण्यासाठी कायदेशीर हमी देण्याचा संकल्प केला तेव्हापासून मोदींची प्रचार यंत्रणा आणि त्यांच्यासाठी अनुकूल माध्यमांनी या संबंधात खोट्याचा बडगा उगारला आहे. ते म्हणाले, सत्य हे आहे की क्रिसिलच्या मते, २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांना एमएसपी दिल्याने सरकारवर २१ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला असता, जे एकूण बजेटच्या केवळ ०.४ टक्के आहे.

"एकनाथ शिंदेंना अपमानित करायचं नव्हतं..." देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

"उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, तब्बल १०७ कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज जप्त, राजस्थानमधील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश

ज्याला देव मानलं त्यानंच केला घात... नराधम शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला बलात्कार

लॉटरीच की! फक्त ९ हजारात मिळतोय सॅमसंगचा 'हा' 5G स्मार्टफोन; जाणून घ्या काय आहे फीचर्स?