राष्ट्रीय

संपूर्ण हिमाचल प्रदेश आपत्तीग्रस्त जाहीर

पावसाच्या बळींची संख्या ७५ वर

नवशक्ती Web Desk

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये रविवारपासून झालेल्या पावसाच्या बळींची संख्या ७५ वर पोहोचली असून, राज्य सरकारने संपूर्ण राज्याला आपत्तीग्रस्त प्रदेश म्हणून जाहीर केले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये रविवारपासून जोरदार पाऊस झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी ढगफुटी, भूस्खलन, दरडी कोसळणे, डोंगर खचणे, रस्ते वाहून जाणे असे प्रकार घडले आहेत. नद्यांना पूर आला असून, शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. रविवारपासून झालेल्या अतिवृष्टीने ७५ बळी घेतले आहेत. त्यापैकी २२ जणांचा मृत्यू शिमला येथे तीन भूस्खलनाच्या घटनांमध्ये झाला आहे.

राज्यात २४ जून रोजी पावसाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत २१७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ११,३०१ घरांचे पूर्णत: किंवा अंशत: नुकसान झाले आहे. अनेक जनावरे वाहून गेली आहेत. पाणी साचल्यामुळे राज्यातील ५०६ रस्ते अद्याप वाहतुकीसाठी बंद आहेत. विजेचे ४०८ ट्रान्स्फॉर्मर्स आणि १४९ पाणीपुरवठा योजना बंद आहेत. आर्थिक नुकसानही अतोनात झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शुक्रवारी संपूर्ण राज्यालाच आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

Voter ID नसेल तर मतदान कसं करायचं? जाणून घ्या 'ही' महत्त्वाची माहिती

Mumbai : घर कुठंय तुझं? बाईकस्वार तरुणीला ट्रॅफिक सिग्नलवर त्रासदायक अनुभव; सोशल मीडियावर शेअर केला Video

‘नको घेऊ ऑर्डर, मीच खातो!’; दरवाजापर्यंत डिलिव्हरीवरून वाद, झोमॅटो रायडरने स्वतःच फस्त केलं जेवण, Video व्हायरल

रस्त्यात सापडली ४५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग; सफाई कर्मचारी महिलेने जे केलं ते सगळ्यांना शक्य नाही!

Mumbai : हार्बरवर एसी लोकलचं पुनरागमन! २६ जानेवारीपासून सेवा पुन्हा सुरू; १४ फेऱ्यांचं संपूर्ण वेळापत्रक बघा एकाच क्लिकवर