राष्ट्रीय

पाकिस्तानकडे जाणारा रावी नदीचा प्रवाह थांबला; भारतातील शाहपूर कंदी धरणाचे काम पूर्ण झाल्याचा परिणाम

सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शाहपूर कंदी बॅरेज प्रकल्पाला गेल्या तीन दशकांमध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागला

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तान आता पाण्यासाठी आसुसणार आहे. शाहपूर कंदी धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रावी नदीच्या पाण्याचा पाकिस्तानकडे जाणारा प्रवाह पूर्णपणे थांबल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. शाहपूर कंदी बॅरेज पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेवर आहे.

यापूर्वी पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या ११५० क्युसेक पाण्याचा आता जम्मू-काश्मीर क्षेत्राला फायदा होणार आहे. कठुआ आणि सांबा जिल्ह्यांतील ३२ हजार हेक्टर पेक्षा जास्त जमिनीला फायदा करून हे पाणी सिंचनासाठी वापरले जाईल.

सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शाहपूर कंदी बॅरेज प्रकल्पाला गेल्या तीन दशकांमध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. आता २९ वर्षांनंतर शाहपूर कंदी बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये सिंधू जल करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती, ज्या अंतर्गत रावी, सतलज आणि बियास नद्यांच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे, तर सिंधू, झेलम आणि चेनाब पाकिस्तानच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे. शाहपूर कंदी बॅरेज बांधल्यानंतर रावी नदीचे पाणी राखून ठेवण्याचा अधिकार भारताला आहे. पूर्वी हे पाणी लखनपूर धरणातून पाकिस्तानकडे जात असे, मात्र आता या पाण्याचा फायदा पंजाब आणि जम्मू-काश्मीरला मिळणार आहे.

राजीनामाच हवा! प्रधान यांच्या हकालपट्टीवर CJP ठाम, आज निर्णय होणार?

CJP Protest Delhi : पेलेट गनचा वापर झाल्याचे राहुल गांधी यांनी दाखवले पुरावे; Video

पेपरफुटीतील दोषींना आता १० वर्षे कैद, १० कोटी दंड; सरकार करणार नवा कायदा

लाठीमाराबाबत सोमवारी ‘सर्वोच्च’ सुनावणी

Gujarat Monsoon Fury : गुजरातमध्ये पावसाचा 'हाहाकार'; Video