राष्ट्रीय

यूपीआयच्या माध्यमातून सर्वाधिक पेमेंट झाल्यामुळे पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिले की, 'ही एक उत्कृष्ट कामगिरी आहे.

वृत्तसंस्था

जुलै महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून सहा अब्ज रुपयांचे व्यवहार झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. २०१६ मध्ये देशात यूपीआय पेमेंट सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वोच्च आकडा आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिले की, 'ही एक उत्कृष्ट कामगिरी आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून अर्थव्यवस्था स्वच्छ करण्याचा भारतातील लोकांचा सामूहिक संकल्प यातून दिसून येतो. पंतप्रधानांनी पुढे लिहिले की, 'कोविड-१९ महामारीच्या काळात डिजिटल पेमेंट लोकांसाठी उपयुक्त ठरली.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात यूपीआयद्वारे ६.२८ अब्ज व्यवहार झाले, ज्यामध्ये सुमारे १०.६२ ट्रिलियन रुपयांचे व्यवहार झाले. महिन्या-दर-महिन्यानुसार, जून महिन्याच्या तुलनेत यूपीआयद्वारे व्यवहारांची संख्या ७.१६ टक्के वाढली आहे. त्याच वेळी, यूपीआय द्वारे केलेल्या एकूण व्यवहारांमध्ये जूनच्या तुलनेत ४.७६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; कुर्ला ते वाशी मार्गावर ब्लॉक

Mumbai Hit-and-Run : मिठीबाई कॉलेजजवळ भरधाव दुचाकीची १५ वर्षीय मुलीला धडक; चालक फरार, CCTV फुटेज व्हायरल

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, ९ कामगार जखमी, Video

Thane : वर्षभर रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग; ७०८ पदांसाठी १ आणि २ सप्टेंबरला परीक्षा

Mumbai : ५० फेलोच्या जागेसाठी बीटेक, डॉक्टरांचे अर्ज; ५० जागांसाठी ४५०० जणांचे आवेदन, महापालिकेत कंत्राटी भरती