राष्ट्रीय

सुप्रीम कोर्टाने बँकेला फटकारले

वृत्तसंस्था

शेतकऱ्यांसाठी ‘वन टाईम सेटलमेंट’चा (ओटीएस) प्रस्ताव स्वीकारुन त्यांना मंजुरी पत्रे जारी करावीत, या मध्य प्रदेश हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणाऱ्या बँकेला न्यायालयाने सोमवारी चांगलेच फटकारले. ‘बँक बड्या कर्जदारांकडे फिरकत नाही, मात्र गरीब शेतकऱ्यांना त्रास देते,’ असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

न्या. डी.वाय. चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हायकोर्टाच्या आदेशाची दखल घेत सांगितले की, या आदेशात काहीही चुकीचे नाही. त्यामुळे आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही.

या खटल्यातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहता हायकोर्टाने दिलेले आदेश अत्यंत योग्य व न्याय्य आहेत, असे आमचे मत आहे. त्यामुळे घटनेतील कलम १३६ अंतर्गत हस्तक्षेप करण्याची कोर्टाला आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ही विशेष सुट्टीतील याचिका फेटाळून लावत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२