राष्ट्रीय

तृणमूलच्या जाहीरनाम्यात सीएए रद्द करण्याचे आश्वासन

केंद्रात इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास सीएए रद्द करण्याबरोबरच अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तृणमूलचे राज्यसभेतील नेते डेरेक ओब्रायन यांनी जाहीरनामा घोषित केला.

Swapnil S

कोलकाता : पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा घोषित केला. केंद्रात इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास सीएए रद्द करण्याबरोबरच अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तृणमूलचे राज्यसभेतील नेते डेरेक ओब्रायन यांनी जाहीरनामा घोषित केला.

केंद्रात इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास दरस्थिरता निधी स्थापन करून पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्याचे, नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याचे आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे घरपोच रेशन आणि द्रारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकाचे १० सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीत आहे.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले