राष्ट्रीय

तामिळनाडूत दोन फटाका कारखान्यांना आग ; १३ जणांचा मृत्यू, दोन जखमी

प्रतिनिधी

विरुधनगर : विरुधनगर जिल्ह्यात रंगापलायन व किचनयाकानपट्टी या गावांत दोन फटाका कारखान्यांना आग लागली. या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

ही आग विझवायला पोलीस, अग्निशमन दल व बचाव पथकाने तात्काळ सुरुवात केली. रंगापलायन येथील कारखान्यात सात जळालेले मृतदेह सापडले. त्यांची ओळख अजूनही पटू शकली नाही, तर या आगीतून तीन जणांची सुटका करण्यात आली.

किचनयाकानपट्टी येथे लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला, तर दोन महिलांना वाचवण्यात यश आले. त्यांना श्रीवुल्लूपत्तूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ३ लाख रुपयांची, तर गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था