राष्ट्रीय

पिलीभीत लोकसभा मतदारसंघातील ३०० गावांची व्यथाच वेगळी; आतापर्यंत २२ जणांचा वाघाने घेतला बळी

बंगाल टायगरचे (पॅन्थेरा टायग्रिस) निवासस्थान असलेल्या लगतच्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्पामधून येणाऱ्या या वाघांच्या हल्ल्याला गावांतील लोकांना नियमितपणे तोंड द्यावे लागत आहे.

Swapnil S

पिलीभीत : आधुनिकीकरण आणि प्रगतीच्या गप्पा मारल्या जात असतानाच पिलीभीत लोकसभा मतदारसंघातील सुमारे ३०० गावांतील ग्रामस्थ हे मानव विरुद्ध प्राणी अशा आदिम स्वरूपातील संघर्षामुळे हैराण झाले आहेत. अधिकृत नोंदीनुसार नोव्हेंबर २०१९ पासून या गावांमधील २२ पेक्षा अधिक लोकांना वाघांची शिकार व्हावे लागले आहे. यामुळे या लोकसभा निवडणुकीत हा मानव विरुद्ध प्राणी असा संघर्ष एक महत्त्वाचा निवडणूक मुद्दा बनला आहे.

बंगाल टायगरचे (पॅन्थेरा टायग्रिस) निवासस्थान असलेल्या लगतच्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्पामधून येणाऱ्या या वाघांच्या हल्ल्याला गावांतील लोकांना नियमितपणे तोंड द्यावे लागत आहे.

९ एप्रिल रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवार जितिन प्रसाद यांच्या समर्थनार्थ पुरणपूर भागात राजकीय रॅली काढण्याच्या काही तास आधी, ५५ वर्षीय शेतकरी भोले राम यांना वाघाने भक्ष्य बनवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाची भव्यता जगासमोर नेण्याची घोषणा केली, तर भोलेरामचे कुटुंबीय आणि इतर काही गावकऱ्यांना याचा आनंद झाला नाही. आमचे जीवन देवाच्या कृपेवर आहे. वाघ कधी शेतातून उडी मारून आम्हाला किंवा आमच्या मुलांना शिकार बनवेल हे आम्हाला माहीत नाही, असे भोलेरामचे नातेवाईक आणि जामुनिया गावातील रहिवासी पारस राय यांनी सांगितले.

गेल्या सहा महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात भोलेरामसह चार जणांचा या गावात मृत्यू झाला आहे. पिलीभीतमध्ये या मृत्यूमुळे मनुष्य-प्राणी संघर्ष हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. वाघांमुळे कायमच अस्तित्व धोक्यात आलेल्या गावकऱ्यांकडून वाघांना जंगलाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. राजकीय पक्षांनाही याची जाणीव होऊ लागली आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि माजी मंत्री भागवत सरन गंगवार यांनी ११ एप्रिल रोजी भोले राम यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी १२ एप्रिल रोजी जिल्ह्यात घेतलेल्या राजकीय मेळाव्यात गंगवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा वन्यप्राण्यांकडून लोकांचे बळी जात आहेत. सत्तेत आल्यावर हा प्रश्न सोडवू, असे सांगत यादव यांनीही हा मुद्दा उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला.

२०२२ मध्ये वाघाच्या हल्ल्यात आपला भाऊ गमावलेले शेतकरी उमाशंकर पाल म्हणाले, वाघांना रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी जंगलाच्या सीमेवर कुंपण घालावे अशी आमची इच्छा आहे. परंतु अद्याप काहीही केले गेले नाही. आम्ही पाहत आहोत. आमच्या शेतात नियमितपणे वाघ येत असतात ज्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण होतो. गावकरी, प्रामुख्याने लहान जमीन असलेले शेतकरी, त्यांच्या शेतांशिवाय करू शकत नाहीत.

मुंबईत उद्या पाणीपुरवठा खंडित; काही भागात कमी दाबाने पाणी

सुभाषचंद्र बोस यांना ‘राष्ट्रपुत्र’ घोषित करा; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Tanvi Kolte : मराठी जिंकलं, आता 'बिग बॉस हिंदी'मध्ये एंट्री? विजेत्या तन्वी कोलतेने दिलं उत्तर; म्हणाली - "ऑफर मिळाली..."

IPL 2026 : गोलंदाजांची आज अग्निपरीक्षा; सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांमध्ये जुगलबंदी

रुग्णांसाठी एकीकृत कार्यपद्धती लागू करावी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश