नवी मुंबई

नवी मुंबईतील उलवे वहाळ परिसरात साचलेल्या पाण्यात अडकली शाळेची बस

एक शाळेची बस अडकून पडली. बसमधील विद्यार्थी घाबरल्याने स्थानिक नागरिकांनी तसेच अन्य वाहनचालकांनी या बस ला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

देवांग भागवत

रविवारपासून सुरु असलेल्या पावसाने आपला जोर मंगळवारी देखील कायम ठेवला. मंगळवार ५ जुलै रोजी पहाटेपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाच्या माऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी पाणी साचण्याच्या, वाहतूककोंडीच्या घटना घडल्या. अशातच शाळेसाठी निघालेले विद्यार्थीही पावसाच्या पाण्यात अडकल्याचे चित्र नवी मुंबईतील उलवे वहाळ येथे पाहायला मिळाले. वहाळ येथील काहीअंशी रस्त्याचे काम सुरु आहे. याठिकाणी खड्डे आणि शेजारीच नाला असल्याने मुसळधार पावसामुळे हे नाले पूर्णपणे भरत रस्त्यावर देखील गुडघ्याएवढे पाणी साचले. याच पाण्यात सकाळच्या सुमारास एक शाळेची बस अडकून पडली.

बसमधील विद्यार्थी घाबरल्याने स्थानिक नागरिकांनी तसेच अन्य वाहनचालकांनी या बस ला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ही बस मुख्य रस्त्यावर सुखरूप आणण्यात आली.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी