नवी मुंबई

नवी मुंबईतील उलवे वहाळ परिसरात साचलेल्या पाण्यात अडकली शाळेची बस

एक शाळेची बस अडकून पडली. बसमधील विद्यार्थी घाबरल्याने स्थानिक नागरिकांनी तसेच अन्य वाहनचालकांनी या बस ला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

देवांग भागवत

रविवारपासून सुरु असलेल्या पावसाने आपला जोर मंगळवारी देखील कायम ठेवला. मंगळवार ५ जुलै रोजी पहाटेपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाच्या माऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी पाणी साचण्याच्या, वाहतूककोंडीच्या घटना घडल्या. अशातच शाळेसाठी निघालेले विद्यार्थीही पावसाच्या पाण्यात अडकल्याचे चित्र नवी मुंबईतील उलवे वहाळ येथे पाहायला मिळाले. वहाळ येथील काहीअंशी रस्त्याचे काम सुरु आहे. याठिकाणी खड्डे आणि शेजारीच नाला असल्याने मुसळधार पावसामुळे हे नाले पूर्णपणे भरत रस्त्यावर देखील गुडघ्याएवढे पाणी साचले. याच पाण्यात सकाळच्या सुमारास एक शाळेची बस अडकून पडली.

बसमधील विद्यार्थी घाबरल्याने स्थानिक नागरिकांनी तसेच अन्य वाहनचालकांनी या बस ला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ही बस मुख्य रस्त्यावर सुखरूप आणण्यात आली.

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल

लाडक्या बहिणींवर अपात्रतेची तलवार; ई केवायसी न केल्यास योजनेतून होणार आऊट; केवळ १ कोटी ६० लाख महिलांनी केली केवायसी

सर्वसामान्यांना झटका; रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ, २६ डिसेंबरपासून नवे दर लागू

'दिगंतारा' करणार अंतराळातील क्षेपणास्त्रांचे ट्रॅकिंग; उपग्रहांच्या मदतीने ठेवणार नजर

बांगलादेशात हिंदूंची परिस्थिती चिंताजनक! मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता