नवी मुंबई

प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास टाळाटाळ; मंत्री गणेश नाईकांना न्यायालयाने घेतले फैलावर

विद्यमान मंत्र्यांना कायद्याचे ज्ञान असूनही याचिकेवर उत्तर सादर करायला वेळ नाही, असे नमूद करत गणेश नाईकांवर ताशेरे ओढले. दोन दिवसांत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करा, असा आदेश न्यायालयाने दिले.

Swapnil S

मुंबई : निवडणूक याचिकेवर भूमिका मांडण्यास टाळाटाळ करणाऱ्या भाजपचे मंत्री गणेश नाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाने फैलावर घेतले. न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या एकलपीठाने, विद्यमान मंत्र्यांना कायद्याचे ज्ञान असूनही याचिकेवर उत्तर सादर करायला वेळ नाही, असे नमूद करत गणेश नाईकांवर ताशेरे ओढले. दोन दिवसांत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करा, असा आदेश न्यायालयाने दिले.

ऐरोली विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविणाऱ्या गणेश नाईक यांच्या निवडीला शिवसेनेच्या मनोहर मढवी यांनी न्यायालयात आव्हान देत याचिका दखल केली आहे.

भाजप, शिवसेना शिंदे गटाने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका ईव्हीएममध्ये घोटाळा, मतदारांना पैशाचे वाटप तसेच मतदार याद्यांमध्ये घोळ घालत या निवडणूक जिंकल्या. या विधानसभा निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आला. तसेच बेकायदेशीर पद्धतीने गैरमार्गाचा वापर करून निवडणुकीत भरगोस मते मिळवली, असा आरोप करून निवडून आलेल्या नाईक यांची निवड अवैध ठरवण्याची मागणी केली आहे.

याचिकेवर न्या. एन. जे. जमादार यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्या मनोहर मढवी यांच्या वतीने युक्तिवाद करताना याचिका दाखल असताना अधिक २५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी याचिकेवर उत्तर नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

Mumbai : विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना

IRCTCचा महत्त्वाचा निर्णय; LPG टंचाईमुळे रेल्वे केटरिंगमध्ये इंडक्शन वापरण्याचे निर्देश

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात